Breaking News

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी शहाजीबापू पाटील मैदानात; पारे तलावासह मान नदीला पाणी देण्याचे नियोजन

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी शहाजीबापू पाटील मैदानात; पारे तलावासह मान नदीला पाणी देण्याचे नियोजन


शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी प्रशासनाची धावपळ; पारे तलाव, मान नदी व कालव्यांना पाणी देण्याचे नियोजन 

शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाचा प्रतिसाद; गळती रोखून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्याच्या सूचना

सांगोला : पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून सांगोला परिसरातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. 

मा. आमदार शहाजीबापू पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेती व पिण्याच्या पाण्याबाबत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

पारे तलावात पुढील चार ते पाच दिवसांत पाणी सोडण्याबाबत प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले.

 तसेच रविवारपर्यंत मान नदीचे आवर्तन पूर्ण करून सोमवारी कॅनॉलमध्ये पाणी आणण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.

पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचणे महत्त्वाचे असल्याने कालवा व जलवाहिन्यांमधील गळती तातडीने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 यासंदर्भात NRBC चे क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून लिकेजच्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.

मान नदीवरील बंधारे भरण्यावर भर

मान नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

यामुळे परिसरातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

टेंभू योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने

टेंभू योजनेतून कॅनाल तसेच बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून संबंधित गावांना पूर्ण क्षमतेने पाणी देण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

 पाणी वितरणातील अडथळे दूर करून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

म्हैसाळ योजनेतूनही बंधारे भरणार

म्हैसाळ योजनेतून परिसरातील बंधारे आणि संबंधित पाणी योजना पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली.

 त्यामुळे आगामी काळात सांगोला परिसरातील पाणीटंचाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वेळेत आणि पूर्ण क्षमतेने मिळावे, यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. 

शेती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन परिसर सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता कदम, कार्यकारी अभियंता मासाळ, टेंभू योजनेचे हारगुडे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

तसेच अशोकभाऊ शिंदे, विजयदादा येलपले, चेअरमन अनिल खटकाळे, अनिल मोटे, योगेश खटकाळे, सुखदेव येड्रॉवकर, महादेव लाडे, अजय ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पाण्याचे नियोजन केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचावे, 

यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Post a Comment

0 Comments