google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावचा डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी - जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद-

Breaking News

सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावचा डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी - जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद-

सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावचा डाळिंब उत्पादनाचा


पॅटर्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी - जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद-

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) शेतकरी बांधवांनी कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या डाळिंब या पर्यायी पिकाकडे वळणे आवश्यक आहे. तसेच गौडवाडी डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न हा फक्त तालुक्यापुरता मर्यादित न राहता

 तो जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना ही प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक ठरावा असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. ते गुरुवार दिं. १ ऑगस्ट रोजी गोडवाडी ता. सांगोला येथील डाळिंब कार्यशाळेत बोलत होते. 

सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे कृषी विभागाच्या व गौडवाडी येथिल डाळिंब उत्पादक शेतकरी यांचे वतीने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत व निर्यातक्षम डाळींब उत्पादन कार्यशाळा व प्रक्षेत्र भेट संपन्न झाली

यावेळी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले सोलापूर जिल्हा अवर्षण प्रवणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील भूजल पातळीचा व उपलब्ध पाण्याचा विचार करता उसासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिल्यास भविष्यात जल संकट वाढू शकते तेव्हा याचा विचार करून शेतकरी बांधवांनी कमी पाण्यावर 

अधिक उत्पादन देणाऱ्या डाळिंब या पर्यायी पिकाकडे वळणे आवश्यक आहे. तसेच गौडवाडी डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न हा फक्त तालुक्यापुरता मर्यादित न राहता तो जिल्ह्यासाठी इतर शेतकऱ्यांना ही प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरावा व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा 

असे आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डाळिंब पिकाला आवश्यक क्रॉपकव्हरच्या अनुदानासाठी तसेच बायोगॅस युनिट अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 

डाळिंब निर्यातीमधील आडचणी तसेच डाळिंब भौगोलिक मानांकनाचा वापर याबाबत पाठपुरावा करू असे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी आण्णा गडदे व नाना माळी यांचे निर्यातक्षम डाळिंब प्लॉटची पाहणी केली व समाधान व्यक्त करून

आडचणी समजुन घेतल्या. यावेळी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले सोलापूर जिल्हा अवर्षण प्रवणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील भूजल पातळीचा व उपलब्ध पाण्याचा विचार करता

 उसासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिल्यास भविष्यात जल संकट वाढू शकते तेव्हा याचा विचार करून शेतकरी बांधवांनी कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या डाळिंब या पर्यायी पिकाकडे वळणे आवश्यक आहे.

 तसेच गौडवाडी डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न हा फक्त तालुक्यापुरता मर्यादित न राहता तो जिल्ह्यासाठी इतर शेतकऱ्यांना ही प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरावा व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा

 असे आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डाळिंब पिकाला आवश्यक क्रॉपकव्हरच्या अनुदानासाठी तसेच बायोगॅस युनिट अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 

डाळिंब निर्यातीमधील आडचणी तसेच डाळिंब भौगोलिक मानांकनाचा वापर याबाबत पाठपुरावा करू असे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी आण्णा गडदे व नाना माळी यांचे निर्यातक्षम डाळिंब प्लॉटची पाहणी केली व समाधान व्यक्त करून

आडचणी समजुन घेतल्या.सदर कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून

दत्तात्रय गवसाने जिल्हा अधिक्षक कृषी

अधिकारी सोलापूर, डॉ. राजीव मराठे संचालक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे काका, शितल चव्हाण प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर, मदन मुकणे कृषी उप संचालक स्मार्ट सोलापूर, संतोष कणसे तहसीलदार

 सांगोला, बाळासाहेब लांडगे उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर, डॉ संग्राम धुमाळ वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर , डॉ. सोमनाथ पोखरे शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र 

सोलापूर, डॉ. प्रशांत कुंभार प्राध्यापक उमा ज्युनिअर कॉलेज मोडनिंब, तालुका कृषि अधिकारी पंढरपूर सुर्यकांत मोरे, प्रवीण माने प्रगतशील डाळिंब बागायतदार, कृषि विभागाचा स्टॉफ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या कार्यशाळेसाठी उपस्थित डॉ. राजीव मराठे यांनी जिल्हा पातळीवर निरोगी व सशक्त अशा डाळिंब कलमासाठी प्रमाणित रोपवाटिका स्थापन करणार असल्याचे सांगितले 

तसेच प्राध्यापक कुंभार सर यांनी डाळिंबातील एक खोड लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकऱ्यांना या तंत्रज्ञाचा अवलंब करण्याचे त्यांनी आवाहन केले.

 राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. धुमाळ सर यांनी डाळिंबाच्या निरोगी रोपांची निवड व त्याचे महत्त्व,. डॉ. पोखरे सर यांनी डाळिंबावरील तेलकट रोग व्यवस्थापन मर रोग व्यवस्थापन, सुत्रकृमी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेसाठी आटपाडी, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, जत आधी भागातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेचे प्रस्ताविक शिवाजी शिंदे तालुका कृषी अधिकारी सांगोला यांनी केले

 तर सूत्रसंचालन व आभार श्रीधर शेजवळ कृषी पर्यवेक्षक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी गुरूकृपा शेतकरी गटाचे सदस्य नाना माळी, आण्णा गडदे, कल्लापा गडदे, शिवाजी हिप्परकर आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments