google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजकीय द्वेशापोटी अतिक्रमणाच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांवर होणारा अन्याय थांबवा : सुरजदादा बनसोडे

Breaking News

राजकीय द्वेशापोटी अतिक्रमणाच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांवर होणारा अन्याय थांबवा : सुरजदादा बनसोडे

 राजकीय द्वेशापोटी अतिक्रमणाच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांवर होणारा अन्याय थांबवा : सुरजदादा बनसोडे

सर्व व्यावसायिकांना सोबत घेऊन लोकप्रतिनिधींच्या ऑफिस समोर आंदोलन करणार

सांगोला/(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) 

सांगोला शहरामध्ये सांगोला नगरपरिषद कार्यालयाकडून राजकीय द्वेशापोटी अतिक्रमणाच्या नावाखाली हातगाडी, टपरी, भाजीपाला, फळ विक्रेते

 अशा छोट्या व्यावसायिकांवर टपऱ्या हटवण्यासाठी दबाव आणला जात आहे. परंतु नगरपालिका प्रशासन या छोट्या व्यापाऱ्यांकडून त्या जागेचे भाडे म्हणून रोज 20 रुपयांची पावती फाडत आहे.

 20 रुपयांची पावती फाडत असेल तर ते अतिक्रमण कसले. असा प्रश्न उपस्थित करत नगरपालिका प्रशासनाने छोट्या व्यावसायिकांवर टपऱ्या हटवण्यासाठी दबाव आणला 

तर नगरपालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा आरपीआय तालुकाध्यक्ष मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी दिला आहे.

काल मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सांगोला शहरातील सुमारे 200 हातगाडी, टपरी, भाजीपाला, फळ विक्रेते इत्यादी छोट्या व्यवसायिकांची अंबिका मंदिर येथे बैठक संपन्न झाली. 

या बैठकीसाठी संघर्ष समितीचे नेते ज्येष्ठ पत्रकार नागेश जोशी, माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार, आरपीआय तालुकाध्यक्ष मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे, 

 शिवसेनेचे तुषार इंगळे, मा. उपनगराध्यक्ष अरुण भाऊ बिले, व्यापारी महासंघाचे सचिव संजय भाऊ गव्हाणे, तसेच जिल्हा पेपर विक्रेते संघाचे अध्यक्ष उत्तमराव चौगुले यांनी उपस्थित

 राहून सर्व छोट्या व्यवसायिकांना मार्गदर्शन करून, छोट्या व्यवसायिकांचे व्यवसाय हटविले तर नगरपालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

त्यानंतर सर्व व्यावसायिक व संघर्ष समितीचे नेते नगरपालिकेच्या प्रांगणात मुख्याधिकारी यांना  निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना आरपीआय तालुकाध्यक्ष मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे

 म्हणाले नगरपालिका जर छोट्या व्यवसायिकाकडून दररोज टॅक्स भाडे घेऊन पावती देत असेल तर अतिक्रमण कसे ठरवून दिलेल्या जागेतच गेली कित्येक वर्षे ते व्यवसाय करीत आहेत.

 शासन व लोकप्रतिनिधी त्यांना नोकरी देत नाही स्वतःच्या कुवतीवर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतील तर त्यांना व्यवसाय करू द्यावा. 

 गेले कित्येक वर्षे व्यापार पेठेत मंदीचे वातावरण आहे. त्यांनी उद्योग व्यवसायासाठी बँकेचे कर्ज घेतलेले आहे. जर अशा परिस्थितीमध्ये या सर्व छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय नगरपालिका प्रशासनाने राजकीय द्वेशापोटी हटविले

 तर त्यांच्या कुटुंबासहित नगरपालिकेच्या प्रांगणात हलगी मोर्चा व गेट बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सुरजदादा बनसोडे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments