google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन महूदमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शेतकरी परिषद

Breaking News

डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन महूदमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शेतकरी परिषद

 डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन महूदमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शेतकरी परिषद

 महूद , ता . ५ राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरुवारी ( ता . ७ एप्रिल ) सायंकाळी महूद ( ता . सांगोला ) येथे शेतकरी परिषद होत आहे . यामध्ये जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे . 


रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मैदानावर होणाऱ्या शेतकरी परिषदेसाठी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन महूद ग्रामस्थांनी केले आहे . माजी आमदार दीपक आबा साळुंखे - पाटील यांनी ही माहिती दिली . लोकसहभागातून राष्ट्रीय जल पुरस्कार महूदकरांनी मिळवला .आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ . राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन जलक्रांतीसाठी मिळाले आहे . जलक्रांतीमध्ये दिल्याबद्दल 


श्री . भुजबळ हे महूद ग्रामस्थांचे परिषदेत कौतुक करणार आहेत . शेतकरी शेतकरी योगदान परिषदसाठी आमदार शहाजी पाटील , माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील , युवा नेते डॉ . बाबासाहेब देशमुख , अखिल भारतीय डाळिंब उत्पादकमहासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे आदी उपस्थित राहणार आहेत . डाळिंब उत्पादक घालणार साकडे डाळिंब पंढरी म्हणून सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याने ओळख तयार केली आहे . 


नैसर्गिक आपत्ती आणि रोगकिडीमुळे डाळिंब पंढरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे .जिद्दीने उभ्या केलेल्या डाळिंब बागा शेतकऱ्यांनी तोडल्या आहेत . त्यामुळे डाळिंब पंढरीचे उत्पादन वर्षाला ३ हजार कोटी रुपयांवरून यंदा ८०० कोटींपर्यंत कमी झाले . पुढील वर्षी ४०० कोटी मिळेल की नाही , असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे . अशा कठीण काळात डाळिंब पंढरी पुन्हा उभी रहावी


 म्हणून शासनाचे सहकार्य यासाठी डाळिंब उत्पादकांची बाजू लावून धरावी , असे साकडे शेतकरी परिषदेत श्री . भुजबळ यांना घालण्यात येणार आहे . डाळिंब पंढरी पुन्हा उभी करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून विशेष पॅकेज मिळावे , अशी विनंती श्री . भुजबळ यांना केली जाणार आहे . परिषदेसाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे , असे अखिल भारतीय समता परिषदेतर्फे आवाहन करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments