google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पाणी प्रश्नाबरोबरच डाळिंबाच्या समस्येबाबत उपाययोजना करून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार- डॉ . बाबासाहेब देशमुख

Breaking News

पाणी प्रश्नाबरोबरच डाळिंबाच्या समस्येबाबत उपाययोजना करून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार- डॉ . बाबासाहेब देशमुख

 पाणी प्रश्नाबरोबरच डाळिंबाच्या समस्येबाबत उपाययोजना करून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार- डॉ . बाबासाहेब देशमुख


सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुका आणि डाळिंब हे समीकरण अधिक घट्ट झालेले आहे . डाळिंबावरील विविध समस्यांमुळे डाळिंब उत्पादक अडचणीत सापडला आहे . कोरोनासारख्या रोगावर लस मिळू शकते तर वर्षानुवर्षे डाळिंबावर तेल्या , मर रोगावर उपाययोजना का होऊ शकत नाही . डाळिंबावरील समस्येबाबत तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांना घेऊन डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांबरोबर लवकरच बैठक घेऊन समस्येबाबत विचारविनिमय करण्यात येईल . 


तालुक्यातील पाण्या प्रश्नाबरोबरच डाळिंबाच्या समस्येबाबत उपाययोजना करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शेकापचे नेते डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी दिली . सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे . परंतु या डाळिंब संशोधन केंद्राचा डाळिंब उत्पादक शेतकन्यांना फायदाच होत नसल्याने या डाळिंब संशोधन केंद्राची असून अडचण नसून खोळंबा ' अशी अवस्था झाली आहे . सांगोला तालुका हा डाळिंबाचा आगार म्हणून नावारूपाला आला आहे . तालुक्यात जवळजवळ पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर


डाळिंबाची लागवड आहे . परंतु ज्या डाळिंबमुळे शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा झाली , शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमान उंचावले . त्याच डाळिंबीवरील विविध रोगांमुळे दिवसेंदिवस तालुक्यातील डाळिंबाचे क्षेत्र घटू लागले आहे . राज्यात मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातून डाळिंबाचे उत्पादन होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात डाळिंब संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली . परंतु डाळिंब संशोधन केंद्र जिल्ह्यात असूनही डाळिंबाच्या विविध रोगांवर ठोस असे उपाययोजना होत असल्यामुळे डाळिंब उत्पादक मात्र त्रस्त झाला आहे .

डाळिंबावरील समस्येबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन शास्त्रज्ञांबरोबर लवकरच बैठक मर रोगाने डाळिंब क्षेत्र होवु लागले कमी डाळिंबावरील मर रोगांमुळे तालुक्यातील डाळिंब क्षेत्र घटू लागले आहे . बहार धरण्याअगोदर आणि धरल्यानंतर डाळिंबाची झाडे वाळून जातात . तसेच त्या क्षेत्रामध्ये लवकर डाळिंब लागवड ही करता येत नाही . लागवड करून बहार धरेपर्यंत दोन ते तीन वर्षाचा काळ जात असल्याने व काही बागा बहार धरायचे अगोदरच मर रोगांमुळे बागा वाळुन जात असल्याने सुद्धा शेतकरी अडचणीत सापडला आहे . या रोगावर ठोस असा उपाय योजना नसल्याची डाळिंब उत्पादक सांगत आहे .

Post a Comment

0 Comments