google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसील कार्यालयसेतू विभागात सुरु आहे सावळा गोंधळ

Breaking News

सांगोला तहसील कार्यालयसेतू विभागात सुरु आहे सावळा गोंधळ

 ऑनलाईन प्रणालीमुळे विविध दाखले तातडीने मिळतील असे म्हटले जात असताना आता हीच प्रणाली विद्यार्थी , पालकांसाठी डोकेदुखीची ठरत आहे . अर्ज केल्यानंतर लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गोची होऊ लागली आहे .


परिणामी , संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हे के खोरपणामुळेच अणद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून पालकवर्गामधून व विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे . विद्यार्थी व नागरिक मध्यस्थींच्या जाळ्यात अडकू नये किंवा त्यांची फसवणूक होऊ नये . त्यांनी चांगली सुविधा मिळावी , या उद्देशाने विविध दाखले , प्रमाणपत्र ऑनलाइन करण्यात आले आहे . वरवर ही अतिशय चांगली यंत्रणा वाटते . परंतु वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पालक व विद्यार्थी खाजगीत सांगत आहेत . सांगोला तालुक्यात सेतूबाबत संबंधीत विभागाच्याअधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा आढावा घेण्यात येत नाही . त्यामुळे सर्व सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा आहे . तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचे नुकसान न करता विद्यार्थ्यांनी मागणी केलेले दाखले लवकरात लवकर द्यावेत , अशी मागणी होत कामकाजाची प्रक्रिया सहज सुलभ व्हावी या उद्देशाने हे केंद्र आहे . मात्र , या केंद्रात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा परस्परांमध्ये समन्वय नसल्याने व देण्यात येणारी प्रमाणपत्रे ही मध्यस्थींच्या माध्यमातून दिली जात असल्याने याचा मोठा फटका विद्यार्थी व नागरिकांना सहन करावा लागतो . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लागणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते . याच संधीचा फायदा कार्यालयात बसलेली मंडळी उठवितात . प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा चौपट वपाचपट रक्कम घेऊन ही प्रमाणपत्रे वितरित होत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे . तहसील परिसराला मध्यस्थी करणाऱ्या लोकांनी घेरले आहे . सामान्य विद्यार्थ्यांना थेट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो . परिणामी हे विद्यार्थी मजबुरीमुळे मध्यस्थींचा आधार घेतात व मध्यस्थी त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करतात . यामुळे सामान्य विद्यार्थ्यांची मोठी लूट होत आहे . या मध्यस्थींची तहसील परिसरातून हकालपट्टी करावी , अशी मागणी विद्यार्थी वर्गांमधून जोर धरु लागली आहे . दरम्यान , सेतू सुविधा केंद्रामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे . याकडे संबंधीत विभागाच्या प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे .

Post a Comment

0 Comments