पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा निर्णय; पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहर तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेसाठी
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
उन्हाळ्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीची बैठक ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या बैठकीत उजनी धरणात सात टीएमसी पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर,
लाभक्षेत्र विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मे २०२६ पासून भीमा नदीमार्गे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले गेले.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाणी राखीव आराखडा सादर केला.
उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन उजनी धरणामध्ये पिण्यासाठी आवश्यक पाणी राखण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
हा निर्णय जिल्ह्यातील नागरिकांसाठी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची खात्री देणारा असून पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच सुटण्याची अपेक्षा आहे.


0 Comments