google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन .

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन .

ब्रेकिंग न्यूज...महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनीधी --महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. 

बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजितदादांनी अखेरचा श्वास घेतला, 

ज्यामुळे अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 'सकाळी ७ वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री' अशी त्यांची शिस्तबद्ध ओळख होती. 

अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावला आहे. बारामतीसह संपूर्ण पुण्यात शांतता पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि मुले पार्थ व जय असा परिवार आहे.

      अजित पवार मुंबईहून एका खासगी विमानाने बारामतीकडे येत होते. सकाळी ९:१५ च्या सुमारास धावपट्टीवर उतरत असताना विमानाला आग लागली. 

स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बारामतीकडे प्रस्थान केले आहेत.

 सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दिल्लीला गेले होते. तात्काळ त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले आहे.

      अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राजकारणातील 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि प्रशासकीय पकडीसाठी ओळखले जात होते. 

त्यांनी १९८२ मध्ये सहकारी कारखान्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले, 

परंतु काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. १९९१ पासून ते सलग बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी जलसंपदा, अर्थ, नियोजन आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली.

Post a Comment

0 Comments