google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुःखद बातमी! अरण्यऋषी मारूती चित्तमपली यांचे निधन

Breaking News

दुःखद बातमी! अरण्यऋषी मारूती चित्तमपली यांचे निधन

दुःखद बातमी! अरण्यऋषी मारूती चित्तमपली यांचे निधन


पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षींचे होते. त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मागील महिन्यातच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोलापुरात राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे.

 चितमपल्ली यांचा जन्म 1932 साली झाला होता. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती. 

ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता. सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली यांना अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते.

 वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर स्वत:ला वाहून घेतलं होतं. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळी साहित्य निर्मितीही केली आहे. अशा एका ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा सन्मान पद्म पुरस्काराने नुकताच करण्यात आला होता. 

चितमपल्ली यांनी सोलापूरच्या टी. एम.पोरे स्कूल आणि नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 

त्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील संस्थामधून घेतले. त्याचबरोबर त्यांनी संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचाही अभ्यास केला आहे. 

राज्य सरकारच्या वन विभागात 30 वर्ष त्यांनी नोकरी केली. या कार्यकाळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते. या प्रकल्पासह कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

Post a Comment

0 Comments