google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून म्हैसाळ योजनेचे पाणी गळवेवाडी बंधाऱ्यात दाखल ; सरपंच विकास गळवे गळवेवाडी सरपंच आणि महिला ग्रामस्थांनी केले पाणीपूजन

Breaking News

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून म्हैसाळ योजनेचे पाणी गळवेवाडी बंधाऱ्यात दाखल ; सरपंच विकास गळवे गळवेवाडी सरपंच आणि महिला ग्रामस्थांनी केले पाणीपूजन

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून म्हैसाळ योजनेचे पाणी गळवेवाडी बंधाऱ्यात दाखल ;



सरपंच विकास गळवे गळवेवाडी सरपंच आणि महिला ग्रामस्थांनी केले पाणीपूजन 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी कोरडा नदीत म्हैसाळ योजनेतून पाणी सोडावे आणि नदीवर असणारे सर्व बंधारे भरून द्यावेत या मागणीसाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि

 जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले साहेब आणि मुख्य अभियंता गुणाले साहेब यांच्याकडे सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता.

 त्यांच्या मागणीला अखेर यश आले असून म्हैसाळ योजनेचे पाणी गळवेवाडी हद्दीत दाखल झाले असल्याची माहिती गळवेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विकास गळवे यांनी दिली आहे. 

दरवर्षी सांगोला तालुक्यातील तहानलेल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो असेही यावेळी सरपंच विकास गळवे यांनी आवर्जून नमूद केले. 

म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्याच्या इतिहासात सर्वप्रथम माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातूनच कोरडा नदीत दाखल झाले होते.

 तीच परंपरा निरंतर चालू ठेवून या नदीत पाणी सोडण्यासाठी दरवर्षीच दिपकआबांचा सिंहाचा वाटा असतो अशी आठवणही यावेळी विकास गळवे यांनी केली. 

सांगोला तालुक्यातील माण आणि कोरडा या प्रमुख दोन नद्यांत पाणी सोडून नद्यांवर असलेले बंधारे भरून मिळावेत अशी आग्रही मागणी सुरुवातीपासूनच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली होती. 

त्यांच्या मागणीनुसार माण नदीत पूर्वीच टेंभू योजनेतून पाणी सोडण्यात आले होते मात्र कोरडा नदी अद्याप कोरडी होती. गळवेवाडी, सोनंद, जवळा, आलेगाव, मेडशिंगी आणि वाढेगाव परिसरातील अनेक

 शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून कोरडा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्याची मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे दिली होती. शेतकऱ्यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी याबाबतचा पाठपुरावा संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सुरू केला होता. अखेर त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला यश आले असून 

म्हैसाळ योजनेचे पाणी गळवेवाडी येथील कोरडा नदीच्या बंधाऱ्यात दाखल झाले आहे. या पाण्याचा वेग चांगला असल्याने लवकरच या पाण्यातून कोरडा नदीवर असणारे सर्व बंधारे भरतील असेही शेवटी सरपंच विकास गळवे यांनी स्पष्ट केले.  

चौकट ; 

१) गळवेवाडी सरपंच आणि महिला ग्रामस्थांनी केले पाणीपूजन 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून गळवेवाडी बंधाऱ्यात दाखल झालेल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे गळवेवाडी गावचे

 सरपंच विकास गळवे तसेच महिला ग्रामस्थांनी कोरडा नदीपात्रातील पाण्याचे विधीवत पूजन केले आणि कोरडा नदीला पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल

 माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार मानले. कोरडा आणि माण नदीवरील मेथवडे पर्यंतचे सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्याची ग्वाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माजी आमदार दिपकआबांना दिली आहे.

Post a Comment

0 Comments