google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..इंद्रायणी नदीवर पर्यटक उभे असताना हा पूल तुटला आणि यामध्ये २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर सहा जणांचा मृत्यू

Breaking News

खळबळजनक..इंद्रायणी नदीवर पर्यटक उभे असताना हा पूल तुटला आणि यामध्ये २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर सहा जणांचा मृत्यू

खळबळजनक..इंद्रायणी नदीवर पर्यटक उभे असताना हा पूल तुटला


आणि यामध्ये २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर सहा जणांचा मृत्यू

मावळ – राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी तलाव किंवा कॅनालचा भराव फुटल्याच्या घटना घडल्या होत्या. पण आता मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील जुना पुल कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

इंद्रायणी नदीवरील कुंडमळा या ठिकाणी असलेल्या पुलावर अनेक पर्यटक उभे असताना हा पूल तुटला आणि यामध्ये २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात आतापर्यंत सहा पर्यटकांचे मृत्यू झाला आहे.

 आज सुटीचा दिवस असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. पुलावरही मोठी गर्दी झाल्याने तो कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. पुरात वाहून गेलेल्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. 

दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत.

 हा पूल बराच जुना आहे. असे असताना पुलावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा पूल कोसळला तेव्हा त्यावरून एकूण ५० पर्यटक जात होते. 

त्यामुळे ओव्हरवेट झाल्याने हा पूल क्षणात तुटला आणि त्यावरून जाणारे पर्यटक थेट नदीत कोसळले. नदीत वाहून गेलेल्यांचा शोध घेणे चालू आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

इंद्रायणी नदीवरील कुंडमळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे.

 पण हा पूल गेल्या काही दिवसांपासून सुस्थितीत नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. हा पूल कमकुवत झाल्याची तक्रारही येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.

या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य सुरु आहे. 

घटनास्थळी १८ रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगात असला तरीही वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments