राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या हिताचा राज्यकारभार केला-- आ.डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सध्या सगळीकडेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा ३०० वा जयंती महोस्तव मोठ्या थाटामाटात साजरा होत आसुन.सदर जयंती महोस्तवानिमीत्त अनेक सामाजीक उपक्रम राबविले जात असतात.
तसेच पारंपारीक पध्दतीतुन पोवाडा,ओव्या व नृत्य प्रकारातुन सांस्कृतीक ठेवा जपला जात आहे..तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा ईतीहास वेगवेगळ्या माध्यमातुन जनतेपुढे ठेवला जात आसतो.त्यातुनच लोकांनी विशेषता तरुणांनी प्रेरणा घेता यावी हा प्रयत्न असतो.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी आताचे अहिल्या नगर येथे झाला.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ११ डिसेंबर १७६७ रोजी राजकारभाराची सुत्रे आपल्या हाती घेतली.माळवा प्रांतच्या त्या शासक बनल्या.
जगामध्ये जेंव्हा शुर-विर आशा महान महिलांचा उल्लेख होईल तेंव्हा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव वरच्या क्रमांकावर आसेल.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी राजकारभार चालवताना उचीत न्यायदानाला प्राधांन्य दिले.कोणावरही आंन्याय आत्याचार झाला तर त्यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर या योग्य आसा न्याय देत असत.कोणावरही आंन्याय अत्याचार झालेला त्या कधीही सहन करीत नसत.
राजमाता अहील्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिरे ,धर्मशाळा,घाट बांधले तसेच अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार त्यांनी केला आहे. त्यांनी बांधलेल्या वास्तु या स्थापत्य व वास्तु शिल्पे याची उत्तम उदाहरणे आहेत.
या वास्तु उभ्या करुन कारागीरांना सुध्दा योग्य त्या संधी उपलब्ध करुन देऊन त्या माध्यामातुन गोरगरीबांच्या हाताला त्या काळी काम मिळवुन दिले.
राजमाता अहिल्या देवी होळकर या नित्याने जनता दरबार भरवुन जनतेच्या
आडी-अडचणी सोडवत असत.जनता सुध्दा नि-संकोच पणे आपली गाऱ्हाणी त्यांच्या समोर सांगत असत.राजमाता ईआहिल्यादेवी होळकर यांनी धार्मीक सहनशिलतेवर भर देत
त्यांनी राज्यात जात -धर्म ,भेद-भाव न करता आदर्श राज्यकारभार चालवीला.त्या काळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी औद्योगीक धोरण राबवीले.. त्याचाच परीणाम माळवा प्रांताचा विकास झाला.आज सुध्दा त्यांच्या औद्योगीक धोरणाचा विचार करून विकास साधला जाऊ शकतो.
राजमाता अहिल्या देवी होळकर यांनी शेतकऱ्यांचा कर माफ करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.शेतकऱ्यांना गो पालनाचे महत्व पटवुन देऊन अनेकांना गाई देण्याचा उपक्रम त्यांनी राबवीला होता.
राजमाता अहिल्या देवी होळकर यांनी अत्यंत चुकीच्या आशा सती जाण्याच्या प्रथेला कठोरपणे विरोध केला होता.आज मितीला सतीची प्रथा बंद झालेली
असुन त्याला कायद्याचा आधार निर्माण झाला आहे.यावरुन त्यांची दुरदृष्ठी किती होती याची प्रचिती त्यांच्या कार्यातुन व राज्य कारभार चालवण्याच्या पध्दतीतुन येते.
आज माझ्या सहित अनेक नेते कार्यकर्ते विविध पक्षांच्या व संघटनांच्या माध्यमातुन समाजकारण करीत आहेत.काही सामाजीक संघटना समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहेत.आज राजकारणाच्या माध्यमातुन जर समाजसेवा करीत जनतेचा सर्वांगीण विकास साधायचा असेल
तर राजामाता अहिल्यादेवी होळकर व ईतर जे आपले राष्ट्रपुरुष व राष्ट्रमाता आहेत ते त्या़चा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम केले तर समाजातील शेवटच्या घटकांचा सर्वांगीण विकास होईल.
सांगोला विधानसभेचे पंच्चावन्न वर्षे ज्यांनी प्रतिनिधित्व केले ते स्व आबासाहेब यांनी आयुष्यभर सर्व राष्ट्रपुरुषांच्या व राष्ट्रमातांच्या राजकारणाच्या माध्यमातुन समाजसेवा केली
तोच वसा तोच विचार मी आयुष्यभर पुढे घेऊन जाणार असल्याची भावना आमदार बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
0 Comments