ब्रेकिंग न्यूज! म्यानमारनंतर आता भारतातील ‘या’ राज्याला भूकंपाचे झटके
म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहेत. त्याठिकाणी हजारो लोक मृत्युमुखी पडले. अशातच आता भारतातही भूकंपाच्या बातम्या सतत येत आहेत.
दरम्यान आज संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास लडाखच्या लेहमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 मोजण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या भूकंपाची माहिती दिली आहे. भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले.
तथापि, या भूकंपात कोणत्याही जीवितहानीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
अरुणाचल प्रदेशातही काल भूकंपाचे धक्के जाणवले होते. दुपारी 2.38 वाजता लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजण्यात आली. या भूकंपात फारसे नुकसान झाले नसले तरी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर जगभरातील लोक भूकंपाच्या भीतीने भरले आहेत.
भूकंपाचे केंद्र अरुणाचल प्रदेशातील शि योमी येथे होते, जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली होते. भूकंपाचे केंद्रबिंदू भारत आणि चीनच्या सीमेजवळ होते आणि त्याची तीव्रताही खूपच कमी होती. यामुळे खूप कमी नुकसान झाले आहे.
0 Comments