दुरंगी लढत झाली असती तर यापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झालो असतो : आ.डॉ. बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- सांगोला विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मी विजयी झालो आहे, असे अनेकांना वाटत असेल.
पण, वस्तुस्थिती तशी नाही. उलट तिरंगी लढतीमुळे माझे मताधिक्य कमी झाले आहे.
सांगोल्यात दुरंगी लढत झाली असती तर शेकाप यापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आला असता. असे मत डॉ. बाबासाहेब देशमुख आमदार झाल्यानंतर प्रथमच विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली.
सांगोला विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मी विजयी झालो आहे, असे अनेकांना वाटत असेल. पण, वस्तुस्थिती तशी नाही. उलट तिरंगी लढतीमुळे माझे मताधिक्य कमी झाले आहे. सांगोल्यात दुरंगी लढत झाली असती
तर शेकाप यापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आला असता, कारण सांगोल्याच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती, जनतेच्या मनात' सल' होती ती पुसून काढली असा दावाही देशमुखांनी केला.
ते पुढे म्हणाले, मी तसा राजकारणापासून लांब होतो. मात्र, कोरोनाच्या काळात मला जनतेचे काम करण्याची संधी मिळाली. (स्व.) गणपतआबांच्या नंतर मला जनतेकडून प्रतिसाद मिळू लागला. मीही तेवढ्याच तडफ
`ने जनतचे प्रश्न सोडवू लागलो. जनतेच्या सुख-दुःखात मी सहभागी होऊ लागलो, त्यामुळे सांगोल्याच्या जनतेबरोबरा माझे एक नाते तयार झाले, असेही डॉ. आमदार बाबासाहेबांनी स्पष्ट केले.
लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी आणि माझे बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी नवीन होती त्या लोकसभा निवडणुकीने आम्हाला खूप काही शिकविले
त्या निवडणुकीत आलेल्या अनुभवानंतर आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आणि जनतेने आशीर्वा दिल्याने मी विधानसभा निवडणुकीत यशस्वी झालो, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
सांगोल्याचा जनतेने 'ती सल' पुसून काढली
सांगोल्याच्या जनतेने गणपतआबांवर आणि गणपतआबांनी जनतेवर वर्षेनुवर्षे निर्व्याज प्रेम केले. पण, गणपतआबा यांच्या हयातीमध्ये शेकापचा २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.
ती सल सांगोल्यातील जनतेच्या मनात होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने ही सल पुसून काढली आहे, असेही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
पवारांची मदत, फडणवीसांबद्दल आदर
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (स्व.) गणपतराव देशमुख यांच्यापासून ते त्यांच्यानंतर आजही आम्हा देशमुख कुटुंबाला वेळोवेळी मदत
आणि मार्गदर्शन केलेले आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही माढ्यातील भाजप उम्म `दवाराच्या विरोधात काम केले होते.
त्या सर्व गोष्टी विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी आणि सांगोल्याची आपुलकीने चौकशी केली. सांगोल्याच्या विकासासाठी सब तोपरी मदत करण्याची स्पष्ट भुमिका सांगितली.
त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल नितांत आदर आहे. पण विधीमंडळात काम करताना मी तटस्थ भूमिकेत राहणार आहे, अशा शब्दांत आपली राजकीय भूमिका आमदार 'डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केली.
0 Comments