google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...वडील लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापावर केला चाकूने हल्ला ; हल्यात गंभीर बापाचा गेला जीव ; राज्यातील घटना

Breaking News

धक्कादायक ...वडील लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापावर केला चाकूने हल्ला ; हल्यात गंभीर बापाचा गेला जीव ; राज्यातील घटना

धक्कादायक ...वडील लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापावर केला चाकूने हल्ला ; हल्यात गंभीर बापाचा गेला जीव ; राज्यातील घटना 


या घटनेनंतर लग्नाचे भीषण वास्तव किती भयानक आहे याची प्रचिती येते वडील लग्न करुन देत नाहीत 

म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार त्यांचा जीव घेतल्याची घटना राज्यातील छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी येथे घडली. 

यामुळे लग्नाचे भीषण वास्तव पुढे आले असून याप्रकरणी दोन मुलाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपत वाहुळ (वय ४८) रा, वडगाव कोल्हाटी, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. 

त्यांचा मुलगा पोपट वाहुळ (28) आणि प्रकाश वाहुळ (26) ही दोन्ही मुले खाजगी कंपनीत काम करत होती.

 दिनांक 8 मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला. त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होती.

कामावर आलेल्य प्रकाश रागात होता. कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर कामवरील बुटाने वडिलांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला. 

त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे, तरी सुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही, अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही, असे सांगितले.

वडिलांचे उत्तर ऐकून दोन्ही मुलांचा राग अनावर झाला. मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले. दोन्ही मुले बापावर तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. 

जीव वाचवण्यासाठी ते बाहेर पळाले. आरडा ओरड ऐकून संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुल, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले, 

त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली. यामध्ये ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर संपत वाहुळ यांनाघाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री 11.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असतांना 23 मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

पुढील तापास पोलीस करत आहे. या घटनेनंतर लग्नाचे भीषण वास्तव किती भयानक आहे याची प्रचिती येत असून, मुलांच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments