google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा. अंजली जाधव “राष्ट्रीय नारी सन्मान” पुरस्काराने सन्मानित कर्तुत्वान हिरकणीच्या शिरपेच्यात मानाचा त्रिवार तुरा सांगोला

Breaking News

प्रा. अंजली जाधव “राष्ट्रीय नारी सन्मान” पुरस्काराने सन्मानित कर्तुत्वान हिरकणीच्या शिरपेच्यात मानाचा त्रिवार तुरा सांगोला

 प्रा. अंजली जाधव “राष्ट्रीय नारी सन्मान” पुरस्काराने सन्मानित 


कर्तुत्वान हिरकणीच्या शिरपेच्यात मानाचा त्रिवार तुरा सांगोला 

प्रतिनिधी /समाधान मोरे शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज:- प्रा. अंजली जाधव यांना “राष्ट्रीय नारी सन्मान” २०२४ पुरस्कार नुकताच मिळाला. हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

जागतिक मराठी दिनानिमित्त वेद फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, अनुश्री महिला संस्था नवी मुंबई यांच्या 

संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दीपस्तंभ कला साहित्य संमेलन ठाणे या  ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल

 घेऊन राष्ट्रीय दीपस्तंभ कला साहित्य संमेलनात देण्यात येणारा यावर्षीचा“राष्ट्रीय नारी सन्मान” २०२४ पुरस्कार प्रा. अंजली जाधव यांना नुकताच देण्यात आला आहे.

 वेद फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, अनुश्री महिला संस्था नवी मुंबई यांच्या निवड समितीने प्रा. अंजली जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. 

प्रा. अंजली जाधव यांचे शिक्षण B.A.B.ed, M.A.M.ed, SET in Hindi, इतके झाले असून सध्या त्या सोलापूर विदयापीठामध्ये Ph.D. करत आहेत. 

त्यांचा Ph.D. चा विषय तृतीय पंथी लोकांच्या जीवनाशी संबंधित असल्याने त्यांनी संशोधनासाठी बऱ्याच तृतीयपंथी लोकांच्या भेटी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मायेची उभारी दिली. 

समाजाने तृतीयपंथी लोकांना घृणास्पद वागणूक देवू नये म्हणून त्या प्रयत्न करत आहेत. साहित्य लेखनातून तृतीयपंथी लोकांचे दुःख, वेदना मांडून त्यांच्याविषयी सकारात्मक दृष्टिकोण निर्माण करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. 

त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कविता वास्तविक असून काळजामध्ये घर करणाऱ्या आणि माणसाला विचार करायला लावणाऱ्या आहेत.

 मुक्ति (स्त्री मुक्ति आधुनिक संदर्भ) या काव्यसंग्राहासाठी त्यांची वेश्या" हया कवितेची निवड झाली आहे. 

तर बेनाम चिट्टीयाँ काव्यसंग्राहासाठी बेटियों की सिसकीयाँ या कवितेची निवड झाली आहे. त्या सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका असून 

त्या समाजसेवेचे कार्य करतात. त्या रोज 6pm से 7pm. एक तास गरीब विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदान करतात. त्या अभ्यासाबरोबर रांगोळी चित्रकला, शुद्धलेखन, नृत्य याचे ज्ञान देतात. 

त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार, Indien Talent Award, The super Women Award, Mother Teresa memorial Award,

 संत कबीर सेवा रत्न अवार्ड, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श साहित्यिक पुरस्कार, राष्ट्रीय गुरुवंदना पुरस्कार असे काही पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच त्यांनी बालगुन्हेगारांवरती संशोधन केले आहे.

 त्यांच्या संपर्कात असणाऱ्या पालकांचे व विदयार्थ्यांचे त्या समुपदेशन करतात. त्यांचा' पाककला' हा कोर्सही झाल्याने त्या महिलांना घरगुती लघुउद्योगाचे ज्ञान देतात.  

जागतिक मराठी दिनानिमित्त वेद फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, अनुश्री महिला संस्था नवी मुंबई यांच्या संयुक्त 

विद्यमाने राष्ट्रीय दीपस्तंभ कला साहित्य संमेलन रविवार, दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी ग्रंथसंग्रहालय, गोखले रोड, नौपाडा, ठाणे स्टेशननजीक, ठाणे (प.)-४००६०२ या ठिकाणी पार पडले.

प्रा. अंजली जाधव यांना जयराज नायर ज्येष्ठ अभिनेते, मा. डॉ. लक्ष्मण शिवणेकर ज्येष्ठ साहित्यिक कवी, गझलकार शिक्षणतज्ज्ञ, मा. नूतन जयंत, मराठी अभिनेत्री, 

मा. सौ. नेहा निनाद धुरी, चित्रपट निर्माती, उद्योजक, समाजसेविका, मा. सौ. राजश्री बोहरा, अध्यक्ष, अ. भा. म. सा. परिषद, ठाणे, या व इतर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत “राष्ट्रीय नारी सन्मान” हा पुरस्कार देऊन  सन्मानित  करण्यात आले.

Post a Comment

0 Comments