google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कृषी विभाग आणि कम्पन्यांकडून शेतकरी आणि खतविक्रेत्यांची लूट ! कृषी मंत्र्यांनी लक्ष घालावे अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन !- लक्ष्मण हाके प्रवक्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

Breaking News

कृषी विभाग आणि कम्पन्यांकडून शेतकरी आणि खतविक्रेत्यांची लूट ! कृषी मंत्र्यांनी लक्ष घालावे अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन !- लक्ष्मण हाके प्रवक्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  कृषी विभाग आणि कम्पन्यांकडून शेतकरी आणि खतविक्रेत्यांची लूट !


कृषी मंत्र्यांनी लक्ष घालावे अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन !- लक्ष्मण हाके प्रवक्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 

प्रतिनिधी  (सांगोला शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)

सांगोला येथे दोनशेहून  अधिक खते औषधे व बी बियाणे विक्रेत्यांची बैठक शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली.

 या बैठकीत सांगोला तालुक्यात युरिया खताची जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा झालेला नाही त्यामुळे आज रोजी शेतकरी आणि खत विक्रेते अडचणीत आहेत , खरीप हंगाम संपत आला तरी ही कोंडी फुटत नाही

 यात कृषी विभागाने लक्ष घालून हा प्रश्न त्वरित सोडवावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला .

खत उत्पादक कम्पन्या आर सी एफ ,कृपको ,इफको ,जय किसान ,आय पी एल इत्यादी कम्पन्याकडून कृषी विभागाच्या संगनमताने शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे , 

युरिया हवा असेल तर इतर अनावश्यक खते घ्या अन्यथा युरिया मिळणार नाही अशी अडवणूक शेतकरी आणि खत विक्रेत्यांची होत आहे.

 ,फक्त सांगोला या एका तालुक्याचा विचार करावयाचा झाल्यास अधिकृत सर्व्हे नुसार चालू हंगामात 6500टन खताची मागणी होती पण खरीप हंगाम संपत आला तरी आजपर्यँत फक्त 3000टन खत उपलब्द झाले आहे. 

खरीप हंगाम सुरु होण्याच्या सुरवातीला मागणीपेक्षा जास्त खत पुरवठा करण्याच्या वलग्ना शिंदे फडणवीस सरकारने केल्या परंतु शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने केली आहे .

 कृषी विभाग आणि राज्यशासन शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचे सरळ सरळ दिसत आहे .कृषी मंत्र्यांनी यात लक्ष घालावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र  आंदोलन उभे करण्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला .

Post a Comment

0 Comments