google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नरुटे - जानकर वस्ती हायटेक होणार असून रेलवायरचे इंटरनेट सुविधा घरोघरी पोचणार; शाहरुख मुलाणी यांच्या प्रयत्नांना यश सांगोल्यात आयटी हब / पार्क साठी विशेष प्रयत्न करणार

Breaking News

सांगोला नरुटे - जानकर वस्ती हायटेक होणार असून रेलवायरचे इंटरनेट सुविधा घरोघरी पोचणार; शाहरुख मुलाणी यांच्या प्रयत्नांना यश सांगोल्यात आयटी हब / पार्क साठी विशेष प्रयत्न करणार

सांगोला नरुटे - जानकर वस्ती हायटेक होणार असून रेलवायरचे इंटरनेट सुविधा घरोघरी पोचणार;


शाहरुख मुलाणी यांच्या प्रयत्नांना यश सांगोल्यात आयटी हब / पार्क साठी विशेष प्रयत्न करणार

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)

सांगोला. (प्रतिनिधी) – सांगोला येथील नरुटे - जानकर वस्ती हायटेक होणार असून रेलवायरचे इंटरनेट सुविधा घरोघरी होणार आहे त्यासाठी विधानभवन माकप कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

यावेळी मुलाणी यांनी भारत सरकार केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्या सोबत चलभाष वर बोलून रेलटेल कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक संजय कुमार यांना सांगितले त्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख कार्यकारी संचालक विनोदकुमार अग्रवाल यांना सांगितले त्यांनी पुणे विभाग येथील रावीकांत प्रसाद यांना सांगितले

 त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख रत्नेश सिंग यांना सांगितले असताना त्यांनी सांगोला येथील त्यांच्या यंत्रणेला सांगून रेलटेल / रेलवायर कंपनीचे इंटरनेट व केबल टीव्ही या दोन्हींची सुविधा नरुटे - जानकर वस्तीपर्यंत सांगोला शहरातून आणून फायबर वायर इंटरनेट व टीव्ही चॅनल ची सुविधा मिळणार आहे.

यावर वस्ती वरील कर सल्लागार सुनील जावीर म्हणाले की, आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार मुलाणी साहेब. आजच्या काळात इंटरनेटची किती आवश्यकता आहे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, आपण जे हे कार्य केलेले आहे याच्याबद्दल आपले जितके आभार मानावे तितके कमीच आहेत,

 धन्यवाद मुलाणी साहेब .आम्हाला इतक्या चांगल्या  सुविधांचा लाभ करून देतात त्याबद्दल आपले खूप खूप आभार, असे जावीर म्हणाले. दरम्यान रेलटेल कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रेल वायर इंटरनेट चे ठेकेदार यश इलेक्ट्रॉनिक्स चे अक्षय सरवदे व राजकुमार भोसले यांनी विशेष कामकाज केले.

तर मुलाणी म्हणाले की, इंटरनेट सुविधेसाठी भारत सरकारकडून सुरू असलेल्या कार्याचे कौतुक असून, ग्रामीण भागात ब्रॉडबँडचे जाळे विस्तारणे हे एक आव्हान आहे.

 डिजिटली सक्षम समाज बनविणे आणि नागरिकांना ज्ञानआधारित अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी भारत सरकार 'डिजिटल इंडिया' कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन सुविधा आणि तळागाळापर्यंत इंटरनेटचे जाळे विस्तारण्यासाठी ठोस काम करीत आहे.

 इंटरनेट क्षेत्रात '5जी' मुळे मोठी क्रांती घडून येणार असून, टेलिमेडिसिन, शेतीक्षेत्र यांना त्याचा फायदा होणार आहे. इंटरनेटचा दररोजच्या जीवनात कशा पध्दतीने उपयोग होऊ शकेल हे त्यांना पटवून देणार आहे. त्यामुळे गावांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार आणि उत्पन्न वाढणार आहे. 

टेलीमेडिसिन, ई-मार्केट, बिझनेस टू बिझनेस सर्व्हिसेस शक्य होणार असून ग्रामस्थांचे आयुष्य सुकर होण्यासाठी इंटरनेट सुविधा प्रकल्पाद्वारे अनेक सरकारी सेवा दिल्या जाणार आहेत. 

ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवेचा प्रसार सुलभ करण्यासाठी आणि ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमातून सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि परवडणाऱ्या किंमतीत हायस्पीड डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी इंटरनेट सुविधा प्रकल्प सुरू केला आहे. संगणक साक्षर समाज निर्माण करून ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण केली जाणार आहे,

 असे मुलाणी म्हणाले. तसेच, सांगोला तालुक्यात आयटी हब / आयटी पार्क करण्यासाठी विविध तज्ञ लोकांबरोबर बैठका व चर्चा सुरू असून लवकरच यावर देखील विचारविनिमय होईल, जर असे घडल्यास तालुक्यातील तरुण तरुणींना तालुक्यातच रोजगार उपलब्ध होईल, असे मुलाणी म्हणाले.

Post a Comment

0 Comments