सध्या सांगोला तालुक्यात चालत असलेला राजकारण म्हणजे
निव्वळ सर्वसामान्य जनतेची फसवणूक अँड शंकरराव सरगर साहेब
सांगोला:- सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता अनेक निवडणुका या बिनविरोध केल्या जातात
परंतु बिनविरोध करण्यामागे कोणत्या सर्व सामान्य व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केलेला आहे , असं कामकेले असल्यास असेल तर त्यांनी दाखवून द्या निवडणुका कोणत्या मुद्द्यावर बिनविरोध केले
याबाबत कोणताही नेता सांगायला किंवा बोलायला तयार नाही जर तुम्हाला निवडणुका बिनविरोधच करायचा असतील तर शोषित पीडित आणि कायमस्वरूपी सत्तेपासून वंचित असणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून द्यायला हवं माझं तर असं मत आहे
येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती व विधानसभा येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण सर्व राजकीय पुढाऱ्यांनी बाजूला थांबून आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने राजकारणामध्ये विधानसभा आपल्या घरामध्ये घेतलेले आहेत
अशा राजकीय पुढाऱ्यांनी बाजूला थांबून सर्वसामान्य जनतेतील युवकांना संधी देण्यात यावी तरच खऱ्या अर्थाने तुमच्या निवडणुका बिनविरोध करण्याचं कारण सफल होईल अन्यथा आपण केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारणाचा उपयोग करत आहात हे दिसेल यामध्ये सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत आहात हे सिद्ध होईल , अँड शंकरराव सरगर साहेब ग्रुप


0 Comments