सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावाने पिण्याच्या पाण्यासाठी स्वावलंबी बनलं पाहिजे~ जयवंत लवटे
महुद बुद्रुक येथे गावठाण भागासाठी विहीर खुदाईचा शुभारंभ संपन्न..
कोळा /वार्ताहर –सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावाने पिण्याच्या पाण्याबाबत स्वावलंबी झालं पाहिजे त्यासाठी प्रत्येक गावाने टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या पद्धतीने शेतीला शेततळे केले जाते त्या पद्धतीने गावाच्या लोकसंख्येनुसार त्यांचाही काळातील दिवस विचारात
घेऊन गावची लोकसंख्या विचारात घेऊन आरसीसी गाव तलाव करणे भविष्यात काळाची गरज आहे कारण पंढरपूरच्या नदीवरून एमजीपीद्वारे दररोज हजारो रुपयांचे पाणी विकत घेणे हे ग्रामपंचायतीला परवडण्याजोगे नसून त्या प्रमाणात ग्रामपंचायतीची पाणीपट्टी वसुली होत नाही त्यामुळे प्रत्येक गावाने आपल्याच गावामध्ये पावसामध्ये वाहून जाणारे
पाणी अडवून आपल्या गावाच्या शेजारी असलेल्या कॅनॉलच्या लगत किंवा ओढ्याच्या शेजारी शासनाच्या किंवा गायरान जमिनीवर गाव तलाव बांधून पाणीपुरवठा केल्यास भविष्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकतो असे प्रतिपादन महूद येथील शिवाजी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवंत लवटे (भाऊसाहेब) यांनी व्यक्त केले.
महूद बुद्रुक तालुका सांगोला येथे पुणे येथील उद्योग समूहाने महूद गावठाण भागातील पाण्याच्या विहिरीसाठी ग्रामपंचायतीला दोन लाख रुपये देणगी स्वरूपात दिली या कार्यक्रमास तहसीलदार अभिजीत पाटील अतिरिक्त गटविकास अधिकारी विकास काळुंखे अभय दिवाणजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्यासह सर्व ग्रामस्थ नेतेमंडळी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ग्रामविकास अधिकारी जयवंत लवटे आपण आपल्या गाव पातळी लोकसहभाग घेऊन मोठी विहीर खुदाई करून गावाला उन्हाळ्यामध्ये भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करायला हवे सन २०१२ व१३ मध्ये आपल्या जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती.
त्या वेळचे तात्कालीन जिल्हाधिकारी माननीय श्री तुकाराम मुंढे यांनी आपल्या सांगोल्याच्या सभेमध्ये सांगितले होते की आपण किती दिवस टँकरने पाणी पिणार किंवा पंढरपूरच्या नदीवरून पाणी आणून पाणी पिणार ह्या योजना शाश्वत आहेत का सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस सांगोला शहराची निर्मिती झाली.
त्यावेळेस सांगोला शहराच्या लोकसंख्येला अनुसरून सांगोला लगत असलेल्या चिंचोली तलावाच्या पायथ्यावरून सांगोला शहराला पाणीपुरवठा केला जात होता जसजशी सांगोला शहराची लोकसंख्या वाढत चालली तसतसे पाणीटंचाई भासू लागल्याने पंढरपूरच्या नदीवरून पाईपलाईन द्वारे
सांगोला शहराला पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली त्याच योजनेचं पुढे एमजीपीद्वारे संपूर्ण तालुक्यातील सर्व गावांना जोडून पंढरपूरच्या नदीचे पाणी पुरविण्याचे कामकाज सुरू झाले प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक कुटुंबाने आणि प्रत्येक गावाने आपल्याला जेवढे पाणी जमिनीसाठी पिकासाठी जनावरासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पाणी आहे.
ते पाणी आपल्या आपण स्वतःहून तयार करून घेतले पाहिजे म्हणजेच आपल्या तालुक्यातील पडणाऱ्या पावसाचे पाणी आडवले पाहिजे जिरवले पाहिजे ज्या पद्धतीने आपल्या शेतीला जेवढे पाणी लागते तेवढे पाणी अडवून
शेततळ्याच्या माध्यमातून शेत त्याच्या पायथ्याशी विहीर खुदाई करून ते पाणी आपल्या शेतीला पुरवठा करावा. त्या पद्धतीनेच प्रत्येक गावाने आपले पावले उचलून आपणही आपल्या महूद गावासाठी मौजे ढाळेवाडी जवळ व भाडगर च्या किनाराच्या पायथ्याशी असलेल्या गायरान जमिनीवर ज्या ठिकाणी वर्षातून आठमाही पाण्याचा पाझर चालतो.
त्या पाण्याच्या पाजराचा ठिकाणी जर १० कोटी लिटर चा आरसीसी टॅंक बांधला आणि त्यामधून जर गावाला पाणी आणता आले तर त्यासाठी जेवढ्या काही उपायोजना कराव्या लागतील त्या कराव्यात त्यासाठी लागणारे नदी हा आमदार फंडासो खासदार फंड असो
अनेक वेगवेगळ्या विकास योजना असो वित्त आयोग असो व लोकसहभा असो यातून उभा करून आपल्या गावाला भविष्य भासणारी पाणीटंचाई व आपल्या भविष्यातील पिढीला पिण्याचे पाणी तरी कमी पडू नये या दृष्टीने पावले उचलावीत जेणेकरून भाटगरचे वर्षातून तीन वेळा आपल्या भागात पाणी येतं
तर चार चार महिन्याच्या फरकाने तीन वेळा जरी भाटकरचे कॅनॉलमधून तलाव भरून घेतला तरी आपल्याला पंढरपूर वरून विकत पाणी घेऊन गावाला पुरवणे परवडत नसल्यामुळे या तलावती टाकलेले पाणी आपल्या गावाला जर पुरविले तर ते फायदेशीर होऊ शकते
याचा सर्व गावकऱ्यांनी विचार करून त्या पद्धतीनेच पावले उचलावीत व आज रोजी सकाळ उद्योग समूहाने जो आपल्या गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला म्हणीप्रमाणे की ज्ञानेश्वरी रचला पाया तुका झालासे कळस सकाळ उद्योग समूहाने आपला पाया रचण्यासाठी दोन लाख रुपये दिले आहेत.
त्याचा कळस करण्याचे काम आपण सर्व गावकऱ्यांनी करूया आणि त्यासाठी मी स्वतःहून आज आपल्याला माझ्या वतीने आपल्या या विहिरीसाठी ११००० रुपये ची देणगी मी जाहीर करतो आणि या पद्धतीने सर्वांनी सुरुवात करावी आणि हे काम हे त्या उन्हाळ्यापूर्वी पूर्ण करून आपल्या गावाची तहान भागवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे ग्रामविकास अधिकारी जयवंत लवटे यांनी सांगितले.
0 Comments