google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे मुंबईचा गड जिंकणार ?

Breaking News

एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे मुंबईचा गड जिंकणार ?

 एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे मुंबईचा गड जिंकणार ?

मुंबई  ( प्रतिनिधी ) - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले . पण या सर्व घडामोडींमध्ये जनतेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे . एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे . 


भाजपने एक सर्वे केला आहे आणि त्यात नागरिकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे त्याचा भाजपला फटका बसेल असा अंदाज व्यक्तकेला आहे . भारतीय मतदार भावनिक आहे . एकनाथ शिंदे यांनी चूक केल्याचा नागरिकांचा सुर आहे . त्यामुळे आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना याचा फायदा होऊ शकतो असा भाजपच्या सर्वेचा अंदाज आहे . 


शिवसेना भाजपाने फोडली असा आरोप होऊ नये म्हणूनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे . एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर शिवसेनेला २०१ ९ मध्ये मिळालेल्या १८ टक्के मताला भाजपाकडे खेचण्याचा मनसुबा त्यामागे आहे . पण त्यांचा सर्वेक्षणातून वेगळीच माहिती समोर आल्यामुळेभाजपा वेगळी रणनिती वापरण्याची शक्यता आहे .मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे . 


आता मुंबईसह इतर महापालिका निवडणूका जवळ आल्या आहेत . त्यावेळी जर मतदार ठाकरेंकडे वळला तर भाजपाच्या शत प्रतिशत भाजपा या घोषणेला सुरंग लागू शकतो तसेच शिंदे गटही फुटू शकतो . पण तसे होऊ नये यासाठीचे नियोजन भाजपाकडून केले जाण्याची शक्यता आहे .


Post a Comment

0 Comments