google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मस्करी की घातपात | मेहुण्याच्या लग्नाला गेलेल्या भावोजींना टाकलं उकळत्या तेलाच्या कढईत |

Breaking News

मस्करी की घातपात | मेहुण्याच्या लग्नाला गेलेल्या भावोजींना टाकलं उकळत्या तेलाच्या कढईत |

 मस्करी की घातपात | मेहुण्याच्या लग्नाला गेलेल्या भावोजींना टाकलं उकळत्या तेलाच्या कढईत |

 काही नात्यांमध्ये चेष्टा करणे हा तसा हक्क्च समजला जातो पण कधी ही चेष्टा एखाद्याच्या जिवावर बेतू शकते तसेच चेष्टेच्या नावाखाली जुने वाद किंवा खुन्नस देखील कढली जाण्याचे प्रकार घडतात असाच काहीसा प्रकार घडला आहे . बिहारच्या बांका जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला काही तरुणांनी उकळत्या

तेलाच्या कढईत टाकलं. 


मस्करी सुरू असताना वाद झाला आणि त्यातून हा प्रकार घडला.उकळत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आल्यानं व्यक्ती अतिशय गंभीररित्या भाजला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.बांका जिल्ह्यातल्या पहाडपूर येथे राहणारे पप्पू यादव २७ एप्रिलला महादेवावरण येथे गेले. तिथे त्यांच्या मेहुण्याचा विवाह होता. लग्नात विकास यादव आणि शिवा यादव यांनी पप्पू यादव यांची थट्टा केली. त्यावरून वाद झाला. यानंतर विकास आणि शिवा यांनी पप्पू यांना उचलून उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं.


वरातीच्या दिवशी पप्पू यादव घरासमोर असलेल्या बाजेवर झोपले होते. त्यावेळी दोनियार गावचे रहिवासी असलेल्या विकास यादव आणि अन्य तरुणांनी पप्पू यादव यांना गरम तेलाच्या कढईत टाकलं. पप्पू यादव यांच्या पाठीला इजा झाली. जखमी पप्पू यादव यांच्यावर कटोरियातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments