सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दोन लाखांपर्यंत मिळते मदत ! विमा संरक्षण :
अनेक शेतकरी माहितीपासून वंचित
खामगाव शेतकरी वर्ग शेतीमध्ये काम करीत असताना कायमच अपघात होण्याची शक्यता असते . सर्पदश , विचू चावणे , विजेचा शॉक लागणे , पाण्यात बुडून अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो . परिणामी घरातील कर्ता पुरुष दगावल्याने कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद होते .
अशा परिस्थितीत अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत ● शासनातर्फे २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते . मात्र , ग्रामीण भागांतील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेची माहितीच नसल्याचे समोर आले आहे .या कारणांमुळे अपघात झाल्यास संरक्षण रस्ता किवा रेल्वे अपघात , पाण्यात बुडून मृत्यू विजेचा धक्का बसून मृत्यू , वीज पडून मृत्यू , कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य
कारणांमुळे विषबाधा होऊन मृत्यू , उंचावरून पडून झालेला अपघात , सर्प दश व विचू दश , हिस्त्र जनावरांचा हल्ला , जनावरांनी चावल्यास किंवा खाल्ल्यास मृत्यू झाला तर हे विमा संरक्षण दिले जाते .विमा लाभधारक पात्रता विम्याचा लाभ हा १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना विमा छत्र देण्यासाठी सुधारित स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे .
कागदपत्रांसह अर्ज अनिवार्य या लाभासाठी लगेच सहायक कृषी अधिकारी यांना माहिती देऊन संबंधित अपघातातील व्यक्तीच्या अपघात संदर्भातील कागदोपत्री नोंदी करून वैद्यकीय अहवाल , पोलीस पंचनामा , स्थळ पंचनामा आदी गोष्टींसह शेतकऱ्यांनी अर्ज करणे अनिवार्य आहे .@ विमाछत्र कुटुंबातील शेतकऱ्यांचे आई - वडील , पती पत्नी , मुलगा व अविवाहित मुलगी यांचा समावेश ग्राह्य घरण्यात आला आहे .
अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये तर , अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किया दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये भरपाई दिली जाते . अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये भरपाई मिळते ..... यांना लाभ मिळत नाही
नैसर्गिक मृत्यू , विना कालावधीपूर्वीचे अपंगत्व , आत्महत्येचा प्रयत्न , आत्महत्या किया जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे , गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात , अमली पदार्थाच्या नशेतून अपघात , स्त्रियाचा बाळंतपणातील मृत्यू , शरीरांतर्गत रक्तस्राव , मोटार शर्यतीतील अपघात , युद्ध सैन्यातील नोकरी आदी घटनाचा या विमा संरक्षणात समावेश नाही .
हप्ता भरण्याची गरज नाही डिसेंबर २०१५-१६ मध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून , या योजनेच्या माध्यमांतून किमान एक लाख व कमाल दोन लाखापर्यंत निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे .
येथे शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही . कारण सरकार शेतकऱ्यांच्या वतीने विमा कंपनीकडे पैसे भरते .जनजागृती आवश्यक शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या संदर्भात ग्रामीण ● भागातील शेतकऱ्यांना काहीही माहिती नाही . या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे



0 Comments