*जाहीर निषेध*
केंद्र सरकारने प्रबोधनकरांच्या यादीतून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळले
केंद्र सरकारने प्रबोधनकरांच्या यादीतून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळले आहे.त्यामुळे " भिमलहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटनेच्या " व सकल मातंग समाजाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करत आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रपुरुष,स्वतंत्रता सेनानी,लोकप्रबोधनकार,लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची उपेक्षा व अवहेलना केल्यामुळे येत्या 24 तासात सरकारने जनतेची माफी मागावी तथा प्रबोनकारांच्या यादीमध्ये त्यांचे शुभनाव त्वरीत अादरसहीत समाविष्ट करावे अन्यथा संपूर्ण राज्यात,देशात पक्ष संघटनांच्या व सकल मातंग समाजाच्या वतीने करो या मरो हे आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल याची नोंद घ्यावी
निवेदक:
श्री.सुनिल भिमराव सकट
(जिल्हाध्यक्ष) "भिमलहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटना" अहमदनगर जिल्हा
0 Comments