google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्यांवर आता फौजदारी शासनाचे आदेश : ग्रामपंचायतीमार्फत बजावणार नोटीस

Breaking News

रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्यांवर आता फौजदारी शासनाचे आदेश : ग्रामपंचायतीमार्फत बजावणार नोटीस

 रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्यांवर आता फौजदारी शासनाचे आदेश : ग्रामपंचायतीमार्फत बजावणार नोटीस


भर रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांना आता सावध व्हावे लागेल . कारण रस्त्यावर जनावरे बांधणान्यांना ग्रामपंचायतीमार्फत नोटीस बजावली जाणार असून दखल न घेतल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत . राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून ग्रामीण नागरिकांच्या सोईसाठी रस्ते तयार केले ; मात्र काहींनी रस्त्यांवर जनावरे बांधून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे .


 संबंधितांना ग्रामपंचायतींनी नोटीस यजावल्यानंतरही रस्त्यावर जनावरे बांधलीच तर आता फौजदारी कारवाईस तोंड द्यावे लागणार आहे . विदर्भात रस्त्यांवर जनावरे बांधणान्या गायांची संख्या तीन हजारांच्या जवळपास आहे . आता कारवाईकरिता ग्रामपंचायत पुढाकार घेणार आहे . केंद्र व राज्यशासनाच्यावतीने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यात येतो . दहा वर्षापूर्वी गावरस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती . आज गल्लोगल्ली विविध योजनेतून कॉक्रीट रस्ते निर्माण करण्यात आले आहेत . परंतु या रस्त्याचा उपयोग आता पशुपालक गाय , म्हैस , बैल , शेळी


रस्त्यांच्या बाजूला बुंट्याला जनावरे बांधलेली असल्यामुळे सकाळी प सायंकाळी या रस्त्याने चालणे अवघड झाले आहे . अनेकवेळा या रस्त्यावर दुचाकी चालकांचे अपघात झाल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत . घराशेजारी जागा असतानाही सिमेंट रस्त्यावर जनावरे बांधण्याचे प्रकार वाढले आहेत . स्थानिक लोकप्रतिनिधींना काही ग्रामस्थ जुमानत नसल्यामुळे हे अतिक्रमण वाढले आहे .

Post a Comment

0 Comments