google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर , करमाळा , माळशिरस , माढा , सांगोला तालुक्यांत संपूर्ण संचारबंदी

Breaking News

पंढरपूर , करमाळा , माळशिरस , माढा , सांगोला तालुक्यांत संपूर्ण संचारबंदी

 पंढरपूर , करमाळा , माळशिरस , माढा , सांगोला तालुक्यांत संपूर्ण संचारबंदी


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उद्यापासून अंमल , जिल्हाधिकारी शंभरकर काढणार आज आदेश प्रतिनिधी । सोलापूर ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे . पंढरपूर , करमाळा , माळशिरस , माढा व सांगोला या तालुक्यांत  सोमवारपासून ( दि . ९ ) संपूर्णपणे संचारबंदी  लागू करण्यात येणार आहे . याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर रविवारी  जारी करणार आहेत . तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील वाढती  रुग्णसंख्या धोकादायक असल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते .जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पंढरपूर ,  माळशिरस , माढा , सांगोला व करमाळा या तालुक्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे .  शिवाय शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याने रुग्णांच्या  संख्येत वाढ होत आहे . लग्न समारंभ , अंत्यसंस्कारवासार्वजनिक ठिकाणी नागरिकांची  मोठी गर्दी होत आहे . वारंवार कारवाई करूनही  नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने आता पहिल्या टप्यात रुग्णांची संख्या वाढलेल्या  तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे . ग्रामीणमध्ये सध्या एकूण ४४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत . यामध्ये पंढरपूर १०५५ ,  माळशिरस ७ ९९ , माढा ७७३ , सांगोला ८४२ व  करमाळा ४२४ रुग्णांचा समावेश आहे . पाच  तालुक्यांत ३८ ९ ३ रुग्णांचा आहेत . उर्वरित दक्षिण  सोलापूर , अक्कलकोट , उत्तर सोलापूर , मोहोळ , बार्शी व मंगळवेढा या सहा तालुक्यांत ५४ ९ रुग्णअत्यावश्यक सेवांना सवलत रुग्णवाद असलेल्या पाच तालुक्यांत संचारबंदी तालुक्यात लागू करण्यात येणार असली तरी यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात येणार आहे . दूध , भाजीपाला , किराणा दुकाने , हॉस्पिटल , पेट्रोलपंपांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे . याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर रात्री उशिरा आदेश काढण्याची शक्यता आहे . संचारबंदीची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातही बैठक घेण्यात आली आहे . आहेत . पाच तालुक्यातील संसर्ग इतर तालुक्यां पसरू नये , यासाठी संचारवंदीचा निर्णय घेण्या आला आहे . शिवाय ज्या गावांमध्ये बाधितांच संख्या अधिक आहे . त्यावर अधिक लक्ष ठेवण्यात येणार आहे .

Post a Comment

0 Comments