Breaking News

सर्वेक्षणाचा निर्णय : इंदापूरच्या पाण्याचा वाद पेटलेला असताना नवा पर्याय , समिती गठित ' उजनीत येणाऱ्या पाण्याचा आता हिशोब मांडणार ..

 सोलापूर : उजनी धरणातून उपसा सिंचन योजनेद्वारे इंदापूर तालुक्याला पाणी देण्यास विरोध झाल्यावर शासनाने भीमा उपखोन्यातील पाणी सर्वेक्षण करण्याचे ठरविल्याचे समोर आले आहे . यासाठी माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चारजणांची समिती गठित केल्याचे सांगण्यात आले आहे .


ही समिती उजनी धरण क्षेत्राच्यावर असलेल्या भामा , आसखेडा , खडकवासला धरणातून येणाऱ्या पाण्याची मोजदाद करण्यात येणार आहे . यावरून या धरणातून उजनी धरणात किती पाणी येते , याचा हिशोब घालून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे . पुणे , पिंपरी - चिंचवड भागातून सांडपाणी येत असल्याचे दाखवून उजनीतून ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील गावांना उपसा सिंचन योजनेद्वारे नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता . यासाठी २२ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाच्या उपसचिवांनी सर्वेक्षणाचे आदेश काढले होते .  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती दिल्यावर सोलापूर जिल्ह्यातून तीत विरोध सुरू झाला . त्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सर्वेक्षणाचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले . मात्र , याबाबत लेखी आदेश आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेले नाहीत .  त्यामुळे या चर्चेवर वादंग सुरु असतानाच भीमा उपखोन्यातील पाणी  सर्वेक्षणाचा घाट घातला गेल्याचे  समोर आले आहे . या सर्वेक्षणासाठी शासनाने माजी मुख्य सचिव ए . व्ही . सुर्वे यांच्या  अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे . या समितीमध्ये नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पाचे  मुख्य अभियंता , पुणे जलसंपदा  विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे ही समिती उजनी धरणातील पाण्याची पातळी , धरणात असलेला गाळ , धरणातून पिण्यासाठी , शेतीसाठी व औद्योगिकीकरणासाठी होणारा वापर , धरणावरपडणारा एकूण पाऊस , परिसरातील हवामानाच्या बदलाचा अभ्यास करून तीन महिन्यात शासनाला अहवाल सादर करणार आहे.या समितीचे सदस्य केंद्रीय जल आयोग , कृष्णा पाणी तंटा लवाद यांच्याशी चर्चा करून अहवालात नोंद घेणार आहेत .

Post a Comment

0 Comments