google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दोन डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका नाहीच सर्वाधिक मृत्यू लस न घेतलेल्यांचेच ; राज्याच्या आरोग्य विभागाचे निरीक्षण

Breaking News

दोन डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका नाहीच सर्वाधिक मृत्यू लस न घेतलेल्यांचेच ; राज्याच्या आरोग्य विभागाचे निरीक्षण

 सोलापूर , ता . २५ : राज्यात लसीकरण सुरू झाल्यापासून कोरोनाचे २२ लाख ९ ३ हजार रुग्ण वाढले आहेत . त्यातील १२ हजार ३६३ रुग्णांचा मृत्यू झाला , कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाचीपुन्हा बाधा झाली . परंतु , दोन डोस घेतलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही , असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे . राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरवात झाली असून , आतापर्यंत दीड कोटीहून अधिक  व्यक्तींनी लस टोचून घेतली आहे . त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख ५ ९ हजार व्यक्तींचा समावेश असून त्यात वैद्यकीय कर्मचारी , फ्रंटलाईनवरील कर्मचारी , को - मॉर्विड ( पूर्वीचे गंभीर आजार असलेले ) आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे . त्यापैकी ३ ९ हजार ७६८ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे . कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर दोन महिन्यांत दुसरा डोस घेतल्यानंतर 


शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती  टिकून राहते . त्यामुळे , त्यांना पुन्हा  कोरोना झाला , तरीही ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडत नाही .  त्या रुग्णाला शक्यतो कोणताही गंभीर स्वरूपाचा आजार होत नाही , असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे .

Post a Comment

0 Comments