पंढरपूर :ठाकरे सरकारमुळेच महाराष्ट्राची बदनामी, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे : ना.रामदास आठवले समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत ना.आठवलेंची मागणी राज्यात सध्या अनेक विचित्र घडामोडी घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती बिघडत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख झअनुसूचित जाती जमातीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.सुधाकर भालेराव,अण्णाभाऊ साठे महामंडळ माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमितजी गोरखे, संघटक सचिव दीपक चंदनशिवे, प्रदेश महामंत्री सचिन आरडे, प्रदेश सचिव संजीव खिलारे, पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत मस्के, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरुकुल, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे,संचालक सचिन शिवशरण,शहराध्यक्ष गोपाळ भगरे आदीजन उपस्थित होते.ना.आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील सर्वांचा पाठिंबा मिळवून समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवायचे आहे.त्यासाठी आपण जीवाचे रान करून प्रचार केला पाहिजे.समाधान आवताडे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत अनेक गरिब गरजू नागरिकांना मदत केली आहे.त्याच्या या कामाची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. हे या मतदारसंघासाठी मोठ्या फायद्याची गोष्ट आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. पण हे सरकार गरीबांना आरक्षण देत नाही ही मोठी शोकांतिका आहे.अशा या सरकारला जनतेने घरी बसवले पाहिजे.सचिन वाझेचे बोलावता धनी हे सरकार मधील बडे मंत्री आहेत, त्यातील अनिल देशमुख यांनी 100 कोटींची वसुली प्रकरणी राजीनामा दिला आहे.या वसुली सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव जगात बदनाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.याद राखा महाराष्ट्राला बदनाम कराल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली असून शेवटी निवडणुकीची तारिख आहे सतरा आणि राष्ट्रवादीला आहे खतरा ही कविता करून त्यांनी भाषणाचा शेवट केला.समाधान आवताडे बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ही निवडणूक आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे आज त्या विषयावर काहीच बोलत नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत या प्रश्नावर नुसती आश्वासने या जनतेने ऐकली आहेत.आता सुधारणा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यामाध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी सामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. अनेक योजना राबविल्या आहेत कोरोनाच्या काळात महिला वर्गाला,शेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments