लसीकरण न घेणाऱ्या नागरिकांचे सर्व शासकीय लाभ , योजना , सवलती बंद करण्यात येईल तर नाही ना , असा नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .
परंतु आता केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयातील आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाद्वारे आरटीआईमध्ये माहिती देताना कोविड वॅक्सिन ही ऐच्छिक बाब आहे , म्हणजे वॅक्सिन न घेणाऱ्या नागरिकांचे कोणतेही शासकीय लाभ , योजना वगेरे बंद होणार नाहीत , असे स्पष्ट करण्यात आले आहे . राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . यासाठी स्थानिक प्रशासनानेकोविडच्यालसीकरणासाठी पाच एप्रिलपासून ग्रामीण भागात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यासाठी केंद्र सुरू केले आहे . सोबतच काहीदिवसाने १८ वर्षांवरील व्यक्तींनासुद्धा लसीकरण सुरू होणार आहे . यासाठी अनेक उपकेंद्रात लसीकरण सुरू केलेले आहे . आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका गावातील प्रत्येक नागरिकांना संपर्क करून लसीकरणाविषयी जनजागृती करत आहेत . परंतु लसीकरणाविषयी जनतेकडून पाहिजे तसा मिळत नसल्याची चर्चा होत आहे . अशातच स्थानिक प्रशासनाने लसीकरण न केल्यास स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य मिळणार नाही , कुठलेही स्वरूपाचे दाखले अथवा काम होणार नाही , महसूल विभागाकडूनदेखील कुठलीच कागदपत्रे मिळणार नाही , घरकुल योजना , बचत गट , संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना , प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभसुद्धा मिळणार नाही , हे सर्व चुकीचे आहे . यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये | संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .
0 Comments