google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्वात मोठी बातमी : अखेर महाराष्ट्रात लॉकडाऊन ! असे आहेत ३ महत्वाचे नियम22 एप्रिलपासून नवीन नियमावली जाहीर

Breaking News

सर्वात मोठी बातमी : अखेर महाराष्ट्रात लॉकडाऊन ! असे आहेत ३ महत्वाचे नियम22 एप्रिलपासून नवीन नियमावली जाहीर

 22 एप्रिलपासून नवीन  नियमावली जाहीर

महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. २२ एप्रिल म्हणजेच उद्या रात्री ८ वाजे पासून निर्बंध लागू होणार आहेत.


मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५% कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलेली आहअत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येईल. इतर सर्व कार्यालयांमध्ये ५ किंवा १५% कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50% कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. परंतु, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100% कर्मचारी वाढवता येणार आहेत.लग्नासाठी १ हॉलमध्ये २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात अली असून त्यासाठी फक्त २ तासांची वेळमर्यादा दिली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येईल. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलेली आहेत. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५०% प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे, नियमांचे उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.यापूर्वी लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती १०० वर नेण्यात आली होती. पण आता फक्त अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. तसेच अवघ्या २  तासांमध्ये तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. या नियमांचे पालन उल्लंघन केल्यास तुम्हाला  ५०  हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, आसे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

1. रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन

2. ‘1 मे’च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन

3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद

4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद

5. राज्यात जिल्हा बंदी लागू

6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद

7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी

8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी

9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार

10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार

11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा

12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड

13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती

14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार

15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी

16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार

17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार

18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक

19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार

20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार

आता सार्वजनिक वाहतुकीसोबतच खासगी वाहतुकीवरही मर्यादा येणार आहेत. सरकारने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादीत केली आहे. यात काही परिस्थितीत अपवादात्मक सुट्टीहि देण्यात आली आहे. पण, अशा काळी प्रवाशांच्या संख्येबाबत कठोर आणि स्पष्ट सूचना देण्यात आल्या.खासगी बसेस किंवा वाहतूक व्यवस्था केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वापरता येणार. त्यातही चालकासह एकूण जागांच्या ५०%  माणसांची वाहतूक करता येणार. वाहतूक केवळ शहरात किंवा जिल्ह्यांतर्गतच होईल. असा प्रवास इतरांसाठी केवळ अंत्यविधी किंवा कुटुंबातील आजारपण या अपवादात्मक स्थितीतच करता येईल. नियमांचे  पालन न केल्यास १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल.खासगी बसेसला एकूण आसन व्यवस्थेच्या केवळ ५० %  प्रवासी वाहतूक करता येणार आहे. उभ्या प्रवाशांवर पूर्ण बंदी असणार आहे.या काळात असा प्रवास करणाऱ्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन त्यांना १४ दिवसांच्या गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.प्रत्येक प्रवाशाचे तापमान मोजले जाणार. ज्याला कोरोनाची लक्षने दिसतील त्यांना तातडीने कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल प्रवासा दरम्यान तपासणी अधिकाऱ्यांना एखाद्या प्रवाशावर संशय आल्यास ते संबंधित प्रवाशाला सक्तीची कोरोना चाचणी करण्याचे आदेशही देऊ शकतात. त्याचा खर्च प्रवासी किंवा बस मालकाकडून घेतला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments