सरपंचानाही निधी दिला जातो....?
1) लोकप्रतिनिधीं मध्ये खासदार ,आमदार, जि प, पं स आणि ग्रामपंचायतिचे सदस्य येतात.2)ग्रामपंचायत प्रतिनिधींना खालील कामांचे प्रस्ताव ग्रामविकास विभाग ,बांधकाम भवन,25 मर्झबान रोड,फोर्ट मुंबई 400001 यांचेकडे थेट सादर करावयाचे आहेत.
3) कामांचे नाव :-1) गावांतर्गत रस्ते. 2) गटारे.3) पाऊसपाणी निचरा.4) दहन व दफन भूमीची सुधारणा करणे. 5,) संरक्षक भिंत. 6) ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम.7) आठवडे बाजारासाठी सुविधा. 8) कचरा डेपोसाठी व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुविधा. 9) वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण. 10) समाजमंदिर /सभागृह. 11) सार्वजनिक शौचालय. 12) रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक. 13) व्यायामशाळा बांधकाम करणे. 14) प्रवासी निवारा शेड. 15) वाचनालय ईमारत बांधकाम करणे 16) नदीघाट/धोबीघाट बांधकाम करणे.17 ) बगीचे. 18) पथ दिवे बसविणे. 19) चौकाचे सुशोभीकरण .20) ,,इतर मूलभूत बाबी ....4) प्रतिनिधींनी सुचवलेली कामे निवडीचे अधिकार शासनास आहेत . 5) प्रतिनिधींनी सुचवलेली कामे जि प किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत या पैकी कोणत्या यंत्रणेकडून करण्यात यावीत हा निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल . 6) ग्रामपंचायती मार्फत करावयाची कामे 25 मार्च 2015 च्या शासन निर्णयातील सूचना व कार्यपद्धती नुसार करावयाची आहेत .*7) ग्रामपंचायती मार्फत करावयाच्या कामाचा निधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे वितरित करण्यात येतो माननीय सर्व सरपंच याना विनंती , की त्यांनी गावांतर्गत सुचवावयाची मूलभूत सुविधा कामे ग्रामविकास विभागा कडे पाठवावीत त्यामुळे मजुरांना रोजगार मिळेल आणि गावाचा विकास होईल*
*मा पुरुषोत्तम घोगरे पाटील*संस्थापक राज्याध्यक्ष *भाऊसाहे कळसकर*सोशल मिडीया राज्य प्रमुख *सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य*
0 Comments