सांगोला (तालुका प्रतिनिधी): आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल व फळांच्या वाहतुक खर्चावर पन्नास टक्के अनुदान मिळत असल्याने किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील फळे-भाजीपाल्याला देशाची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. आता तर किसान रेल्वेतून सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षे दिल्ली, कलकत्ता, मुझफ्फरपूर येथील बाजारपेठेत पाठवणे सुलभ झाले असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार-सावंत यांनी दिली. देशांतर्गत शेतमालाच्या वाहतुकीला गती मिळावी याकरिता केंद्र सरकारने किसान रेल्वेचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे किसान रेल्वे सुरू झाल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना देशाच्या बाजारपेठेत शेतीमाल पाठवले सुलभ झाले आहे. आत्मनिर्भर अभियानातील ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, बोर , आंबा , केळी , पेरू , पपई, मोसंबी, संत्रा, डाळिंब,लिंबू, अननस, सफरचंद, फणस, बदाम, आवळा, चवळी, कारली, वांगी, काकडी, गाजर, फुलकोबी, मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा, आले, भेंडी, वाटाणे, लसूण, कांदा, बटाटा यासह इतर शेतमाल बुकिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षे कलकता, दिल्ली, मुझफ्फरपूर या बाजारपेठेत पाठवण्यासाठी तीन किसान रेल्वे सुरू आहेत. किसान रेल्वेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी, व्यापाऱ्यांनी आपला शेतीमाल पाठवावा असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार सावंत यांनी केले आहे.
0 Comments