सध्या देशात सांगोला - मुझफ्फरपूर , सांगोला - आदर्शनगर ( दिल्ली ) , सांगोला - शालिमार ( कोलकाता ) , सांगोला हावडा , बंगळुरू - सांगोला - आदर्शनगर , देवळाली दानापूर , अनंतपूर - आदर्शनगर , यशवंतपूर - हजरत निजामुद्दीन , नागपूर - आदर्शनगर , छिंदवाडा - हावडा , इंदोर - गुवाहाटी , रतलाम - गुवाहाटी , इंदौर - आगरतळा या मार्गांवर किसान रेल्वे धावत आहेत
. यापैकी पाच किसान रेल्वे सांगोला स्थानकातून धावत आहेत . किसान रेल्वेला छोट्या स्थानकांवर थांबे असल्याने छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून चांगला नफा मिळवता येत आहे . कमी खर्च , सुरक्षित आणि त्वरित पुरवठा यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलत आहे . किसान रेल्वेमुळे आता छोट्या रेल्वे स्थानकांचे शेती उत्पादनांच्या मोठ्या लोडिंग हबमध्येही रूपांतर होत आहे . सांगोला , बेलवंडी , कोपरगाव , बेलापूर आणि मोडनिंब अशा माल किंवा पार्सल वाहतूक नसलेल्या स्थानकांवर किसान रेल्वेला थांबे देण्यात आले आहेत . या भागातील छोट्या शेतकऱ्यांचा विचार करता या स्थानकांवरीलथांब्यांमुळे डाळिंब , पेरू , सीताफळ , केळी आणि इतर फळे , भाजीपाला आणि मासे देशात विविध ठिकाणी पाठवले जात आहेत . ९ ० हजार क्विंटल शेतमाल , फळांची वाहतूक छोट्या स्थानकांचा कल्पकतेने रेल्वेने वापर सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या नफ्यातही वाढ होताना दिसते आहे . सांगोला हे लहान रेल्वे स्थानक आहे ; मात्र सध्या ते पाच किसान रेल्वेचे मोठे लोडिंग पॉइंट बनले आहे . किसान रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ९ ० हजार क्विंटल शेतीमाल व फळांची वाहतूक तेथून झाली आहे . . ५.५ कोटींचे रेल्वेला मिळाले उत्पन्न देशात सांगोला रेल्वे स्थानकातून धावलेल्या सर्वाधिक किसान रेल्वेच्या ९ २ फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल १ लाख ८ हजार ७२ क्विंटल डाळिंब , केळी , द्राक्षे , सिमला मिरची , लिंबू यांसह इतर शेतीमाल व फळांच्या वाहतुकीतून रेल्वेला ५ कोटी ५ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले , तर १ कोटी ५७ लाख ९ हजार रुपयांची सबसिडी रेल्वेकडून शेतकऱ्यांना मिळाली आहे


0 Comments