google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दानवे यांना आता घरात घुसून चोप द्यावा लागेल - बच्चू कडू

Breaking News

दानवे यांना आता घरात घुसून चोप द्यावा लागेल - बच्चू कडू

 

दानवे यांना आता घरात घुसून चोप द्यावा लागेल - बच्चू कडू

 

Shabdrekha express:

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संबंध चीन व पाकिस्तानशी जोडणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर राज्यमंत्री बच्चू कडू संतापले आहेतरावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून त्यांना चोप द्यावा लागेल,  असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे

केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब,हरयाणासह काही राज्यांतील शेतकरी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेतकृषी कायदे रद्द कराअशी त्यांची मागणी आहेतरकायद्यात बदल करण्याच्या भूमिकेपर्यंत सरकार आलं आहे.मात्रशेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेतकोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली हे आंदोलन सुरू नसल्यामुळं सरकारची मोठी अडचण झाली आहेयाच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून आंदोलनाबद्दल वेगवेगळी वक्तव्ये केली जाते 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना इथं बोलताना, 'हे आंदोलन एक कटकारस्थान आहेआंदोलकांना चीन व पाकिस्तानाची मदत फूस आहे,' असं वक्तव्य केलं होतंत्याच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेतदानवे यांचं वक्तव्य केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेऊन चीन व पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावाअशी मागणी शिवसेनेनं केली आहेतरबच्चू कडू यांनी  'एएनआयया वृत्तसंस्थेशी बोलताना  दानवे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे'मागच्या वेळेस दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होताआता मात्रपरिस्थिती अशी आली आहे की आम्हाला त्यांच्या घरात घुसून त्यांना चोप द्यावा लागेल,  असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments