google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...बँकेच्या गेटवर गळफास! लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात; चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल

Breaking News

धक्कादायक...बँकेच्या गेटवर गळफास! लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात; चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल

धक्कादायक...बँकेच्या गेटवर गळफास! लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात;


चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल 

बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात धक्कादायक प्रकार समोर आला. ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 5 लाख रुपये अडकले होते.

मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव, काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले.

या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा समोर आली आहे.

नेमकं घडलं काय?

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे परत न मिळाल्याने बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात एका वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं. 

छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांवरील विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव असून, त्यांचे छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख तर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत 5 लाख रुपये अडकले होते.

 मुलीच्या लग्नासाठी त्यांना तातडीने पैशांची गरज होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली रक्कम मिळाली नाही.

वारंवार विनवण्या करूनही बँक व्यवस्थापनाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते मानसिक तणावात होते. 

बुधवारी रात्री उशिरा जाधव हे आपल्या कुटुंबासह बँकेत गेले होते. काही वेळातच त्यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर खळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचा बांधावरील वाद थांबेना, तृण काढण्यावरून दोन गट भिडले

बीड जिल्हा आणि हाणामारी जणू समीकरणच बनले आहे. कालच एका महिला शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवंत मारण्याची घटना

 ताजीच असताना आज पुन्हा एक हाणामारीचा व्हिडिओ समोर आला. बीड तालुक्यातील कानडी घाट येथे शेतातील तृण काढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद उफाळून आला.

“तू आमच्या शेतातील तृण का काढतेस?” या कारणावरून एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच तिला जिवे मारण्याची धमकीही दिली गेली.

याप्रकरणी शिवकन्या झोडगे या महिलेच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments