खळबळजनक...बदल्या होऊन अनेक ग्रामसेवक हजरच होईनात!
सोलापूर: जिल्हा परिषदेचे ग्रामसेवकांच्या बदली रद्दसाठी आमदार, खासदारांच्या शिफारशी
सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्ह्यातील जवळपास ७२ ग्रामसेकांच्या बदल्या मागील काही दिवसापूर्वी केल्या आहेत.
परंतु आमच्या भागातील ग्रामसेवकांच्या बदल्या रद्द कराव्यात यासाठी आमदार, खासदारांच्या शिफारशी येत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील जवळपास ५० ग्रामसेवक २० वर्षापेक्षा अधिक काळ एकाच गावात होते. अशा गावातील ग्रामसेवकांची उचलबांगडी झाल्याने राजकीय दबाव आणून बदली रद्द
करण्यासाठी ग्रामसेवकांकडून प्रयत्न होताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही ग्रामसेकांनी बदली झाल्यानंतर लगेच दुसऱ्या गावात हजर झाले. मात्र वर्षानुवर्षे एकाच गावात राहिलेल्या ग्रामसेवकांना मोह सुटत नसल्याचे दिसत आहे.
वास्तविक पाहता ग्रामविकास विभागाचा मोठा ऐतिहासिकनिर्णय घेवून ग्रामसेकांच्या बदल्याचा शासन निर्णय काढला. त्या निर्णयाची अंमलबजावणी सीईओ यांनी केली.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून माहिती घेतली असता किती ग्रामसेवक हजर झाले. परंतु काही ग्रामसेवक पंढरपूरच्या वारीचे कारण पुढे करीत हजर झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
शिवाय ग्रामपंचायत विभागाकडे तशी माहितीही नाही की, किती ग्रामसेवक हजर झाले आणि किती नाही. त्यामुळे वारी मार्गावरील वगळता ठिकाणी इतर तालुक्याच्या बदली झालेल्या ग्रामसेवक तर हजर होणे अपेक्षित आहे.
अगोदरचे ग्रामसेवक पदभार सोडायलाच तयार नसल्याने नवीन ग्रामसेवकांला हजरच होता येत नाही. एकाच गावात वीस वर्ष ग्रामसेवक कार्यरत असल्याने यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे.
बदली रद्दसाठी आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांच्या शिफारशी आणल्या जात आहेत. पंरतु जोपर्यंत ग्रामसेवक हजर होणार नाही तोपर्यंत पगारच न काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
प्रशासन बदलीवर ठाम असून बदली रद्द करण्यासाठी ग्रामसेकांना आता न्यायालयातूनच आदेश आणावे लागणार आहे. वास्तविक पाहता पाच वर्षापेक्षा अधिक काळ ग्रामसेवकांना एका गावात ठेवू नये. झेडपी कर्मचाऱ्यांप्रमाणे बदली झाली पाहिजे.
पालखी मार्गावरील काही ग्रामसेवक हजर झाले नसावे मात्र पंढरपूर तालुक्यातील बऱ्यापैकी ग्रामसेवकांनी बदल्या झाल्यानंतर हजर झाले आहेत. वास्तविक पाहता बदल्याचा नियम आम्हाला लागू होत नाही.
.........शरद भुजबळ, अध्यक्ष ग्रामसेवक संघटना
0 Comments