शक्तीपीठ रद्द करा याबाबत माजी आमदार शहाजी बापू पाटील व तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन सादर...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, शक्तीपीठ महामार्ग नाझरे, वजरे येथील बाधित शेतकरी यांचे उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने,
येथील बागायत कसलेल्या जमिनीतून गेला त्यामुळे जगणे शेतकऱ्यांचे मुश्किल झाले आहे व यासाठी हा महामार्ग रद्द करा याबाबतचे नाझरे व वजरे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन
आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व तहसीलदार संतोष कणसे यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे.
नाझरे गावापासून चार किलोमीटर अंतरावर नागपूर रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग आहे व त्या मार्गास शक्तिपीठ जोडावा यासाठी वेगळा शक्तीपीठ येथून करण्याची गरज नाही व त्यामुळे आम्ही जमिनी देणार नाही हा महामार्ग रद्द करा
अशी कळकळीची विनंती यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी बाधित शेतकरी दादासो वाघमोडे, डॉक्टर सोनवणे, रविराज शेटे, दीपक शिरदाळे,
दत्तात्रय बनसोडे, सचिन बनसोडे, संजय बनसोडे, गुरुलिंग पाटील, बाळासो सरगर, काशिनाथ पाटील, अल्लम प्रभू पाटील, दत्तात्रय देशपांडे ,अशोक बनसोडे, महादेव बनसोडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments