google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला मिरज रोड ते वंदे मातरम् चौक बायपास रस्त्यावरील जीव घेणे आणि धोकादायक स्पीडब्रेकर न हटवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार : अरविंद नाना केदार

Breaking News

खळबळजनक..सांगोला मिरज रोड ते वंदे मातरम् चौक बायपास रस्त्यावरील जीव घेणे आणि धोकादायक स्पीडब्रेकर न हटवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार : अरविंद नाना केदार

खळबळजनक..सांगोला मिरज रोड ते वंदे मातरम् चौक बायपास रस्त्यावरील जीव घेणे


आणि धोकादायक स्पीडब्रेकर न हटवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार : अरविंद नाना केदार 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : मिरज रोड आणि रेल्वे बायपास या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था असताना अगोदर रस्त्यामध्ये अनेक खड्डे आहेत. यामध्ये नियमबाह्य स्पीड ब्रेकर अचानकपणे कोणत्याही सूचना फलक

 किंवा झेब्राक्रॉसिंग नसताना अनेक निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ करून हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास भाग पडणाऱ्याना जाब विचारण्यासाठी लवकरच रस्त्यावर उतरणार आहे.

 दरम्यान मिरज रोड ते वंदे मातरम् चौक बायपास रस्त्यावरील जीव घेणे आणि धोकादायक स्पीडब्रेकर न हटवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे नेते अरविंद नाना केदार यांनी दिला आहे. 

शहराला कोण वाली आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करून, नियम बाह्य - मनाच्या मर्जी प्रमाणे अधिकारी आणि नागरिक वागत आहेत. 

यावर आजी माजी लोकप्रतिनिधी लक्ष देणार आहेत की नाही. शासकीय रस्त्यावर कोणताही सूचना फलक अथवा झेब्राक्रॉसिंग नसताना भले मोठे गतिरोधक उभा केले जात आहेत. 

शहरात यापूर्वीच खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. शहरातील रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शहरात जाण्यासाठी नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. 

त्यामध्येच बायपास रस्त्यावर अचानकपणे गतिरोधक बनवून प्रशासनाला नेमका कोणता हेतू साध्य करायचा आहे. वाहनधारकांचे कंबरडे मोडण्यासाठी शहरातील खड्डे पुरेसे नाहीत का असाही सवाल उपस्थित केला आहे. 

भुयारी गटार योजनेने शहराला वेडा घातला आहे. यामुळे सर्वत्र रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदरचे खड्डे बुजवून घेण्यासाठी मातीचा अधिक वापर केला जात 

असल्यामुळे सर्वत्र चिखल राडा आहे. यामुळे नागरिक पुरतेच हैराण झाले आहेत. तत्पूर्वी शहरातून बाहेर पडण्यासाठी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बायपास रस्त्याची निर्मिती झाली. 

या रस्त्यावरही आजही अर्धवट कामे आहेत. तरीदेखील रातोरात बायपास रस्त्यावर जागो जागी मोठ-मोठे गतिरोधक बनवले आहेत. सदरचे गतिरोधक बनवण्यामागचे कारण अद्याप गुलदस्तातच आहे. 

तसेच सर्वप्रथम रस्त्याची दुरावस्था आणि यामध्येच याबाबत कोणतीही फलक लावण्यात आले नाहीत. यामुळे मागील तीन ते चार दिवसापासून अपघाताची मालिका सुरू आहे. याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत, 

मिरज रोड ते वंदे मातरम् चौक बायपास रस्त्यावरील जीव घेणे आणि धोकादायक स्पीडब्रेकर न हटवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे नेते अरविंदनाना केदार यांनी दिला आहे.

 सांगोला - मिरज रोड रेल्वे ब्रिज खालून पाण्याचा झरा पुन्हा सुरू झाला आहे. यामध्ये देखील मोठे मोठे खड्डे आहेत. यातून अवजड वाहन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अवजड वाहने शहरांमध्ये प्रवेश करत आहेत. 

दरम्यान शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत असून, शहरातील वासूद चौक परिसरात कायम वाहनांची वर्दळ असते. नगरपालिका ते माळवाडी जाताना रेल्वे ब्रिज खाली मोठी खड्डे आहेत. 

अशा परिस्थितीत मार्ग काढताना वाहनधारकाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामध्येच बायपास वरील गतिरोधक कमी ला भरती म्हणून वाहनधारकांना डोक्याला ताप ठरत आहेत.

Post a Comment

0 Comments