google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हे देवा भाऊचे सरकार असून कोणाला न घाबरता बुलडोझरने जिहाद साफ केला जाईल व किल्ले जिहाद मुक्त केले जातील, कसलं ऑपरेशन टायगर? ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही, यामुळे पेंग्विन...'; नितेश राणेंची खोचक टीका सांगोला छत्रपती शिवाजी

Breaking News

हे देवा भाऊचे सरकार असून कोणाला न घाबरता बुलडोझरने जिहाद साफ केला जाईल व किल्ले जिहाद मुक्त केले जातील, कसलं ऑपरेशन टायगर? ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही, यामुळे पेंग्विन...'; नितेश राणेंची खोचक टीका सांगोला छत्रपती शिवाजी

हे देवा भाऊचे सरकार असून कोणाला न घाबरता बुलडोझरने जिहाद साफ केला जाईल


व किल्ले जिहाद मुक्त केले जातील, कसलं ऑपरेशन टायगर?


ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही, यामुळे पेंग्विन...'; नितेश राणेंची खोचक टीका

सांगोला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे *वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या भूमिपूजन सोहळा* महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार *मा. श्री. नितेशजी राणे साहेब* यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी *छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण* करून अभिवादन केले.

याप्रसंगी अक्कलकोटचे विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार *मा. श्री.सचिनजी कल्याणशेट्टी साहेब, सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. चेतनसिंह केदार सावंत, सोलापुर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.शशिकांत नाना चव्हाण साहेब,* हिंदू जागरण मंचाचे जिल्हा संघटक श्री.देवभाऊ कोकाटे, लिंगायत समाज अध्यक्ष श्री.अमर लोखंडे, युवासेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे, श्री. जगदीश बाबर यांच्यासह सकल हिंदू समाज, वीरशैव लिंगायत समाज, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

… म्हणून ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन पेंग्विन हे नाव योग्य, नितेश राणे यांचा टोला काय?  … म्हणून ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन पेंग्विन हे नाव योग्य, नितेश राणे यांचा टोला काय?

लोकसभा आणि विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा जोर वाढलेला आहे. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती काही केल्या थांबलेली नाही.

आता उद्धव ठाकरे गटाचे सात खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. यावरून भाजप नेते तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, ठाकरे यांच्यावर शेरेबाजी करताना, 'टायगर आणि उद्धव ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही, त्यामुळे ऑपरेशन पेंग्विन हेच नाव योग्य ठरेल', असा टोला लगावला आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. ते सोलापूरमधील सांगोला येथील महात्मा बसवेश्वर महाराज सभागृहाच्या भूमिपूजनासाठी आले असताना बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोकणासह राज्यात ठाकरेंना एकामागून एक धक्के दिले जातायतं. आतातर सर्वात मोठा धक्का शिंदे ठाकरेंना देण्याच्या तयारीत असून ठाकरेंचे पाच ते सात खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. जे पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगरमधून फोडण्यात येतील. त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असा दावा केला जातोय. सध्या याचीच चर्चा राजभर सुरू असतानाच नितेश राणे यांनी यावरून ठाकरेंना डिवचले आहे.

राणे यांनी, 'कसलं ऑपरेशन टायगर...? ते तर ऑपरेशन पेंग्विन', टायगर आणि उद्धव ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही. याला ऑपरेशन पेंग्विन हेच नाव योग्य आहे, असा टोला लगावला आहे. तसेच ठाकरेंकडे आता कुणीही राहेलेलं नसून शिंदेंना जे काय करायचंय ते नक्की करतील असाही दावा त्यांनी केला आहे.

तसेच राणे यांनी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना ते म्हणाले की, जर दोन भाऊ एकत्र येणार असतील तर ही चांगली गोष्ट आहे. कुठलं ही कुटुंब एकत्र येणार असेल तर ती आनंदाचीच बाब आहे. त्यावर आता आपण काय बोलणार? पण फक्त एकत्र येणार असे वाटून चालतं नाही तर एकत्र आलं पाहीजे, असाही टोला नितेश राणेंनी लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव-राज एकत्र येणार अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

दरम्यान ठाण्यातून एका आयसिसच्या हेराला ताब्यात घेतल्याचे समोर आल्याचे सांगताना, सर्वांनी जागृत राहण्याची गरज असल्याचेही राणे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी सिंहगडाप्रमाणे सर्वच छत्रपतींच्या किल्ल्यांवरील जिहाद जमीनदोस्त केला जाईल, असा इशारा दिला आहे. हे देवा भाऊचे सरकार असून कोणाला न घाबरता बुलडोझरने जिहाद साफ केला जाईल व किल्ले जिहाद मुक्त केले जातील, असेही त्यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments