सावधान वारं फिरलं! पुढचे 48 तास 'या' 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; महाराष्ट्रावर मोठं संकट
मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरात अजूनही उकाडा आहे. पश्चिम महाराष्ट्र, तळ कोकण आणि विदर्भात अचानक 12 तासांत वारं फिरलं आहे. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.
तर तळ कोकणात पावसानं पहाटेपासून बरसायला सुरुवात केली आहे. तळ कोकणातला पाऊस आता जोर धरणार असून पुढचे 48 तास तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आजपासून पुढचे तीन दिवस ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. विकेण्डला वातावरण बदलणार असून मान्सूनचे वारे पुन्हा वेगानं सक्रिय होणार आहेत.
मान्सूनची उत्तरेकडील सीमा सध्या मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपट्टणम, पुरी, सँड हेड्स बेट आणि बालूरघाट येथून जात आहे. पुढील 48 तासांत मध्य आणि लगतच्या पूर्व भारतातील
काही आणखी भागांमध्ये, विशेषतः विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.
13 जूनपासून 17 जूनपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा कोकणात देण्यात आला आहे. पूर्व भारतात पुढील २४ तासांत कोणताही बदल नाही, त्यानंतर ४ दिवसांसाठी २-३°C घट होईल.
आता बॅगेत छत्री, रेनकोट न विसरता ठेवा, कारण मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. 13 जून रोजी मुंबईत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ही परिस्थिती 14 जून रोजी आणखी तीव्र होऊन काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 15 आणि 16 जून रोजीही हीच स्थिती कायम राहील, त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून,
तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज आणि उद्या (13 व 14 जून) रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह, 50–60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे.
15 जून रोजी काही ठिकाणी, तर 16 जून रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
रायगडसह रत्नागिरी, सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.
समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो घरातच थांबावे आणि नदीकिनारी राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
0 Comments