जयंती महोत्सव मंडळाने चिंता करू नये पु. रा. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री जयकुमार गोरे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला जेवढं जमेल
तेवढं तुम्ही करा बाकी राहीलेले सर्व माझ्यावर सोपवा. जयंती महोत्सव मंडळाने चिंता करू नये,
स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी. जयंती सांगोला येथे भव्यदिव्य आणि मोठ्या उत्साहाने साजरी होत असताना,
काल शुक्रवार दिनांक 30 रोजी समाज प्रबोधन व मार्गदर्शन तसेच 300 विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम. डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. दिपकआबा साळुंखे-पाटील, युवा नेते सागरदादा पाटील,
प्रा. लक्ष्मण हाके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, मा. गटनेते आनंदाभाऊ माने, मा. नगराध्यक्षा राणीताई माने, माजी नगरसेविका छायाताई मेटकरी, दिलीप जानकर,
माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर , उद्योगपती बाळासाहेब ऐरंडे, सिद्धेश्वर नाथा जाधव, शिवाजीनाना बनकर, बाळासाहेब गावडे, संतोष देवकते, दादासाहेब लवटे,
बिरुदेव शिंगाडे, सुरेशअप्पा माळी, काशिलिंग( बाबू )गावडे ,जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, न्यायव्यवस्था चांगली चालली पाहिजे, पाणी आडवा पाणी जिरवा योजना,आपली शक्तिस्थानं वाचली पाहिजेत, हिंदू धर्म वाचला पाहिजे
ही भूमिका पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 300 वर्षापूर्वी घेतली. पु. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ धनगर समाजासाठी नव्हते तर त्यांनी सर्व समाजासाठी कार्य केले.
म्हणून राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्व समाजाच्या शक्तीस्थान आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नसत्या तर आज आपण नसतो असे सांगत, आज चौंडीचा विकास असेल,
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या जन्मस्थळाचा विकास असेल, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचे नाव असेल खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही काम करतोय.
त्यांच्या विचाराचे महत्व अबाधित करण्यासाठी तसेच नव्या पिढीसमोर त्यांचे विचार रुजवण्याचे काम मोदीजींचे आणि देवेंद्रजी यांचे सरकार करीत आहे. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आम. बाबासाहेब देशमुख म्हणाले, स्मारकासाठी बापू - आबा आणि चेतनसिंह केदार तसेच आम्ही मिळून जेवढा निधी लागेल
तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत, सरकारने वर्षभर त्रिशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार मानले.
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचाराचा वारसा आपण पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे सांगत,
मंडळाच्या इच्छेनुसार जेवढी मदत लागेल तेवढी मदत कै. काकासाहेब साळुंखे पाटील ट्रस्टच्या वतीने केली जाईल असा विश्वास दिला.
यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवनगाथा पोवाडा सादर करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रा. बंडोपंत येडगे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा,
जास्तीत जागा वाढवून मिळावी अशी मागणी केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समिती सांगोला व समाजाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.
चौकट :
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. गावातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर काम करीत
असणाऱ्या 2 महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील 27 हजार ग्रामपंचायती अंतर्गत 54 हजार महिला भगिनींना पुरस्कार वितरित होणार आहे.
याबाबत कालच निर्णय झाला असून सांगोल्याच्या मंचावरून ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत घोषणा केली आहे.
0 Comments