सांगोला तालुक्यातील घटना! 'लग्नानंतर चार-पाच दिवसांतच विवाहितेचा छळ';
सात जणांवर गुन्हा, माहेरून २० लाख आण नाही तर..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : लग्नानंतर चार-पाच दिवसांनी लगेचच विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन
घर घेण्यासाठी आई-वडिलांकडून २० लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत विद्या श्रेयांश सूर्यवंशी (रा. परीट गल्ली, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचे पती श्रेयांश सुधीर सूर्यवंशी, सासू सुनीता सुधीर सूर्यवंशी, नणंद मेघा सुधीर सूर्यवंशी, गौरी सुधीर सूर्यवंशी (सर्व रा. कावळेनाका, कोल्हापूर) व श्वेता उमेश पाटील,
उमेश केशव पाटील (दोघे रा. तानाजीनगर, पिंपरी चिंचवड), मावस दीर राजशेखर विश्वासराव सावंत (रा. कावळे नाका, कोल्हापूर) यांच्यावर सांगोला पोलिसांत गुन्हा करण्यात आला आहे.
फिर्यादी विद्या श्रेयांश सूर्यवंशी आणि श्रेयांश सुधीर सूर्यवंशी यांचा एका विवाहाच्या संकेतस्थळावरून ओळख झाली.
त्यानंतर त्यांनी एकमेकाशी फोनवरून संपर्क सुरू झाला. दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीने ३ मार्च २०२४ रोजी नातेवाइकांच्या समक्ष साखरपुडा करण्यात आला.
२८ मार्च २०२४ रोजी दोघांचे सांगोला येथे लग्न झाले होते. लग्नात फिर्यादीच्या आई-वडिलांनी नवदांपत्याला सर्व संसार उपयोगी साहित्य दिले होते.
मात्र तरीही विवाहितेची सासू, पती, नणंद, दीर आणि अन्य नातेवाइकांनी लग्नाच्या चार-पाच दिवसांनी लगेचच तुझ्या आई-वडिलांनी आम्हाला अपेक्षित मानपान, सोने, हुंडा दिला नाही.
घर घेण्यासाठी आई-वडिलांकडून २० लाख रुपये घेऊन ये यासाठी विद्या श्रेयांश सूर्यवंशी यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
९ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व संशयित आरोपींनी मिळून विद्या सूर्यवंशी यांच्या अंगावरील मंगळसूत्र, अंगठी काढून घेतली व मारहाण केली.
२८ एप्रिल २०२४ ते २९ मार्च २०२५ याकाळात माहेरून २० लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण केल्याबाबत सात जणांवर गुन्हा दाखल केला.
0 Comments