आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना आले यश.. टेंभुचे पाणी माण नदीकडे मार्गस्थ
सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या हक्काचे पाणी माण नदीमध्ये सोडण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणविस साहेब यांच्याकडे केली होती.
तसेच राज्याचे पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही टेंभु चे पाणी माण नदीमध्ये सोडण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे समक्ष भेटुन केली होती.
त्यावेळेस पाटबंधारे मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांना पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते..काल परवा मुंबई येथे झालेल्या
मंत्री मंडळाच्या बैठकी आगोदर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी माण नदिमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीबाबत पुनश्च मंत्री महोदयांना आठवण करुन दिली
त्यावेळेस मंत्री महोदयांनी तात्कालीन अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने टेंभु योजनेचे पाणी घाणंद तलावातुन आटपाडी ल.पा.तलावामार्गे माण नदिमध्ये मार्गस्थ झाले आहे.
सदर पाण्याचा विसर्ग ४०० ते ४५० क्युसेक्स इतका आसुन हे पाणी माण नदिमध्ये मार्गस्थ झाले आसल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली
0 Comments