मोठी बातमी..२५ मे ला टेंभूचे पाणी आटपाडी तलावातून माण नदीत दाखल होणार : मा.आ. अॅड. शहाजीबापू पाटील
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभूचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांना दिले आदेश सर्व बंधारे पुर्णक्षमतेने भरणार
सांगोला / प्रतिनिधी : टेंभू योजनेतून सांगोला तालुक्यातील माण नदीला पाणी सोडावे आणि नदीवर असणारे सर्व बंधारे पुर्णक्षमतेने भरून द्यावेत
अशी मागणी मा.आ.अॅड.शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दुरध्वनीवरून केली.
यावर जलसंपदामंत्री ना.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभू विभागाचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांना २५ मे च्या आत तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी टेंभू योजनेनेचे पाणी २५ मे च्या दरम्यान आटपाडी तलावातून माण नदीत सोडण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मा.आ. अॅड. शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिके वाचविण्यासाठी आणि दरातील पशुधन वाचविण्यासाठी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. गेली दोन-चार दिवसापुर्वी तालुक्यात पाऊस पडला आहे.
या पावसाचा आधार शेतकऱ्यांना झाला आहे. तरी ही पाण्याची टंचाई भासत आहे.त्यामुळे मा.आ.अॅड.शहाजीबापू पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांना दुरध्वनीवरू न तालुक्यातील सर्व परिस्थितीची माहिती दिली.
तालुक्याची परिस्थिती अतिशय वाईट असून पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. माण नदीच्या काठावर असलेल्या गावांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत
असल्याने शेतातील उभी पिके, फळबागा जळून चालल्या आहेत. घरासमोरील उभी असणारी जनावरे चारा आणि पाण्याअभावी टाहो फोडत आहेत. उन्हाळी अवर्तनाचे पाणी ही यावर्षी तालुक्याला मिळालेले नाही
त्यामुळे टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून माण नदीवरील सर्व बंधारे पुर्ण क्षमतेने भरावेत अशी मागणी केली. त्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
यांनी टेंभूचे कार्यकारी अभियंता रेड्रीयार यांना सांगोला तालुक्यातील माण नदीवरील सर्व बंधारे २५ तारखेपासून पुर्ण क्षमतेने भरून घ्यावेत असे आदेश दिले व आटपाडीला पुर्ण क्षमतेने पाणी सुरू केले आहे.
तेच पाणी माण नदीत सोडण्यात येणार आहे व माण नदीवरील सर्व बंधारे भरल्याशिवाय पाणी बंद केले जाणार नाही
त्याचबरोबर नवीन तीन मोटारी चालू करण्याचा आदेश ही मंत्रालयातून देण्यात आल्याचे मा.आ.अॅड. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
0 Comments