google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाटंबरे येथे आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे यांचा नागरी सत्कार संपन्न.

Breaking News

वाटंबरे येथे आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे यांचा नागरी सत्कार संपन्न.

 वाटंबरे येथे आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे यांचा नागरी सत्कार संपन्न.


{जल जीवन योजनेच्या कामाचे आ. शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे यांच्या हस्ते उद्घाटन}

वाटंबरे / प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

: सांगोला तालुका वाटंबरे या ठिकाणी शनिवार दि. १३ जानेवारी रोजी सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना एक टीएमसी व माण नदीवरील सर्व १६ बंधारे वर्षातून ३ वेळा भरण्यासाठी ०.६०० mcft असे एकूण १.६०० 

 पाणी नव्याने मंजूर केल्याबद्दल वाटंबरे ग्रामस्थ व  लाभार्थी गावांच्या वतीने सांगोला तालुक्याचे आ. शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे  यांचा नागरी सत्काराचे आयोजन केले गेले होते. 

या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी आ. शहाजी बापू पाटील म्हणाले की टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त असणाऱ्या ८ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान मान्यता मिळाली असून त्यानुसार ५ जानेवारी २०२४ रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. 

यामध्ये सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना एक टीएमसी तसेच माण नदीवरील सर्व कोल्हापुर पध्दतीचे बंधारे वर्षातून तीन वेळा भरुन घेण्यासाठी ०.६०० एमसी एफटी 

असे एकूण १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर करण्यात आले आहे .गेली चार वर्षापासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास भरघोस यश आल्याचे सांगताना तालुक्यातील १९ वंचित गांवांसोबत 

माण नदीवरील २० गावांना याचा मोठा लाभ होणार असून यापुढे माण नदी बारमाही भरलेली असणार, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी या वेळी  सांगितले.

माण नदीवरील सुमारे २० गावांना नव्याने मंजूर झालेल्या ०.६०० एमसीएफटी पाण्याचा मोठा लाभ होणार असून वर्षातून तीन वेळा माण नदीवरील सर्व बंधारे अधिकृतरित्या भरण्यात येणार असल्याने यापुढील काळामध्ये माण नदी बारमाही भरलेली असणार आहे.

या योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर 

यांचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी या वेळी सांगितले . तसेच या सर्व कामाचे श्रेय त्यांनी आ. दीपक आबा साळुंखे पाटील व 

सांगोला तालुक्यातील जनतेला दिले जनतेच्या पाठिंब्याशिवाय व आशीर्वादाशिवाय मी कामे  करू शकलो नसतो असे त्यांनी यावेळी भाषणात म्हटले यावेळी त्यांनी गुहाटीला गेल्यावर

 त्यांना कुणी गद्दार म्हटले कोणी पन्नास खोके म्हटले याचाही त्यांनी यावेळी या आरोपांचा उल्लेख केला, बापू म्हणाले की आमदार होण्याचे माझे स्वप्न नव्हते ती एक चळवळ होती असे त्यांनी म्हटले ,

 सांगोला तालुक्याला विकास कामांना मिळालेल्या निधीचा उल्लेख या वेळी त्यांनी केला जोपर्यंत मी आणि आबा आहे तोपर्यंत सांगोला तालुक्याला विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी आपल्या भाषणात शेवटी ग्वाही दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आताचा जो निर्णय झालेला आहे तो 

सांगोला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे बापू आमदार झाल्यापासून या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सांगोला तालुक्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे 

तसेच तालुक्यातील बेरोजगार युवकांना हाताला काम मिळण्यासाठी कोळा, जवळा ,महुद या तिन्ही भागात एमआयडीसी उभा करण्याचे बापूचे आणि माझे प्रयत्न चालू आहेत 

यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष विजय बाबर, संजय देशमुख, विजय शिंदे ,दादासाहेब लवटे, संभातात्या आलदर यांनी ही आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.

यावेळी वाटंबरे गावातील जल जीवन योजनेच्या कामाचे उद्घाटन आ.शहाजी बापू पाटील व आ.दीपक आबा साळुंखे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 आ. शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे  यांच्यावर सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी   वाटंबरे ग्रामस्थच्या वतीने जेसीपी मधून फुलांचा पुष्प वर्षाव करण्यात आला व वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यास , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते तानाजी काका पाटील, युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडा दादा खटकाळे,

 शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, शहाजी नलवडे,संजय देशमुख, भाजपचे संभातात्या आलदर, सुनील गायकवाड,विजय शिंदे तसेच  मोठ्या प्रमाणात इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या नागरिक सत्कार सोहळ्यासाठी माण नदीवरील सर्व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वाटंबरे गावचे सरपंच, उपसरपंच ,

ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी , संस्थेचे पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ या नागरी सत्कार सोहळ्यास  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विकास पवार यांनी केले.

  वाटंबरे येथे वानराच्या हल्ल्यात वयोवृद्ध नागरिक जखमी.  वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथे  वानरांच्या कळपाने उच्छाद मांडला असून  त्यातील 

एका वानराने  सत्तर वर्षाचे दत्तू सुदाम गेजगे यांच्यावर हल्ला करत  त्यांच्या पायाला चाऊन  त्यांना जखमी केल्याची घटना घडली या वेळी आजूबाजूच्या नागरिक ओरडल्याने वानर पळून गेले. 

या घटनेनंतर दत्तू गेजगे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ सांगोला येथील शासकीय दवाखान्यामध्ये  सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये  उपचारासाठी दाखल केले.

 वन विभाग अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दवाखान्यामध्ये जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला यावेळी त्याना दत्तू गेजगे यांच्या पायाला वानर चावल्याने बारा ते तेरा टाके पडल्याचे आढळून आले .

  या घटनेनंतर वाटंबरे गावचे  सरपंच किरण पवार यांनी फोनवरून वन विभागाशी संपर्क साधला  वन विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम जाधवर यांनी

 त्यांच्या विभागातील कर्मचारी यांना वाटंबरे येथे तात्काळ पाठवून दिले यावेळी या विभागातील कर्मचाऱ्यांना एका वानराला पकडण्यात यश आले. वाटंबरे येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी चार ते पाच वानर वास्

  सांगोला तालुक्यातील शैक्षणिक सुवर्णकाळ म्हणजेच: मा. श्री. बाबुरावजी (भाऊं) गायकवाड वास्तविक पाहता शिक्षणसंस्था किंवा कॉलेजस या समाजाच्या आस्थेचा विषय आहेत. उच्च शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचा  कारखाना असून, यातून बाहेर पडणारा

 प्रत्येक विद्यार्थी देशाचा व समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडला पाहिजे. याची जबाबदारी आपली आहे. हा उदात्त हेतू शिक्षणक्षेत्रात भाऊंनी ठेवला आहे. शिक्षणामुळे समाज जीवनात परिवर्तन घडते

 त्या दृष्टीने प्रत्येक पाऊल भाऊं शिक्षण क्षेत्रामध्ये टाकत आहेत. म्हणूनच भाऊंच्या कार्याचा गौरव अनेक ठिकाणी मानसन्मानसहित केला जातो. प्राध्यापकांनी आपली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडावी

 यासाठी वेळोवेळी भाऊंनी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा कॉलेजमध्ये तयार करून दिल्या आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून प्रशासकीय कामकाजामध्ये भाऊ जातीने लक्ष घालतात . 

याचाच परिणाम असा आहे की आज  कित्येक पालक व विद्यार्थी हे भाऊंच्या या स्वभावामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष जोडलेले आहेत. कॉलेजमध्ये त्यांची सर्वांना आदरयुक्त भीती नेहमी असते. आज शिक्षणाच्या माध्यमातून भाऊंनी तालुक्यात तसे

  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून वाटंबरेच्या कन्येचा सन्मान. {लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक व गोल्ड मेडल देऊन केले सन्मानित} वाटंबरे/प्रतिनिधी:वाटंबरे गावाची 

सुकन्या कु. शितल बाजीराव पवार हिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून अर्थशास्त्र या विषयामध्ये राज्यात प्रथम क्रमांक  मिळवला.गुरुवारी  दि.२३ फेब्रुवारी २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 

नाशिक येथे २८वा दीक्षांत समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमांमध्ये कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांचे हस्ते तिला लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक व गोल्ड मेडल ने सन्मानित करण्यात आले. 

या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मा .राज्यपाल श्री. रमेश बैस होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील होते 

तसेच कुलगुरू डॉ. इंद्र मनी व कुलसचिव मा.भटूप्रसाद  पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील वाटंबरे सारख्या ग्रामीण भागातील मुलीने  जिद्द, चिकाटीच्या, जोरावर अर्थशास्त्र यासारख्या विषयांमध्ये यश मिळवत  राज्यात

Post a Comment

0 Comments