google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; चांद्रयान-३ नं रचला इतिहास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत बनला पहिला देश

Breaking News

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; चांद्रयान-३ नं रचला इतिहास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत बनला पहिला देश

 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; चांद्रयान-३ नं रचला इतिहास,


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत बनला पहिला देश

चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचं अभिनंदन केले. त्याशिवाय देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. चंद्रावर उतरुन भारताने इतिहास रचला आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. सध्या प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे. अखंड भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रे आणि तेथील शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची... भारतातील १४० कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेलीय... ऊर आनंदाने भरून आलाय... आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय... 

गर्वय मला, मी भारतीय असल्याचा... कारण, भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलंय... इस्रोचं यान चंद्राच्या कुशीत शिरलंय... आणि महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेलीयत... 

भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे... भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या... जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली... श्वास रोखले गेले... हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले... आणि बातमी आली... चांद्रयान- ३ मोहीम फत्ते झाली... 

प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले... आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले... आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय.

Post a Comment

0 Comments