google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर! दोन चिमुकल्यांच्या खून प्रकरणाला वेगळेच वळण

Breaking News

सोलापूर! दोन चिमुकल्यांच्या खून प्रकरणाला वेगळेच वळण

 सोलापूर! दोन चिमुकल्यांच्या खून प्रकरणाला वेगळेच वळण

सोलापूर - पतीने व त्यांच्या कुटुंबियांनी चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास देत ज्योती चव्हाण (वय-२७) यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 ज्योतीने आपल्या दोन्ही मुलांचा खून केला होता. याबाबत ज्योती यांचे वडील दिलीप व्यंकटराव गायकवाड (वय-५९, रा.यशवंत नगर,उमरगा, उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

 गुरूवारी सायंकाळी मुलगा अथर्व (वय साडेतीन वर्षे) आणि मुलगी आर्या (वय २) हे व ज्योती या गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले होते.त्यानंतर शुक्रवारी उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, गायकवाड यांच्या फिर्यादीनूसार ज्योती यांचा पती सुहास कैलास चव्हाण हा व त्याचे कुटुंबीय हे ज्योती यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना मानसिक त्रास देत होते.

 यामुळे ज्योतीने आत्महत्या केली,अशी फिर्याद दिली आहे.या फिर्यादीवरून पती सुहास चव्हाण,दीर सुशांत कैलास चव्हाण,सासू मंगल कैलास

 चव्हाण,नणंद सोनू लक्ष्मण जाधव, जाऊ रेखा सुशांत चव्हाण (सर्व रा.कोंडी,उत्तर सोलापूर) यांच्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा तपास सपोनि देशमुख करत आहेत.

Post a Comment

0 Comments