सांगोला तालुक्यात Pm किसान योजनेतील नावे प्रशासन च्या चुकीमुळे अनेक शेतक-याची नावे दुसऱ्या गावामध्ये समाविष्ट
सांगोल्यात PM kisan योजनेचा बट्ट्याबोळ ;
प्रशासनाच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना मोठा फटका !
सांगोला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसला
असून प्रशासनच्या चुकीमुळे सांगोला तालुक्यातील हजारो शेतकरी PM kisan सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गातून प्रशासनच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन च्या चुकीमुळे अनेक शेतक-याची नावे दुसऱ्या गावामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
हजारो लोकांच्या नावे कोणत्याही ठिकाणी शेतजमीन नसताना त्यांची नावे PM kisan सन्मान योजनेत जाणीव पूर्वक समाविष्ट करण्यात आली आहेत.
पात्र नसताना अनेक शेतकऱ्यांची नावे या योजनेत बोगस समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे सांगोला तालुक्यातील हजारो पात्र शेतकरी या PM kisan सन्मान योजनेपासून वंचित राहिले आहेत.
तालुक्यातील शेकडो शेतकरी दररोज तहसील कार्यालयात येवुन कार्यालयाचा उंबरठा झिजवत आहेत. मात्र या शेतकऱ्यांना योग्य वागणूक दिली जात नाही.
तहसील कार्यालयात PM kisan योजनेचे काम पाहणाऱा इसम कार्यालयात बसून शेतकऱ्यांची आडवणूक करून त्यांच्या कडून मनमर्जीपणे पैशांची मागणी करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करत आहे. तरी या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मुग गिळून गप्प बसले आहेत.
PM kisan योजनेचे काम पाहणाऱ्या इसमाच्या गलथान कारभाराचा फटका सांगोला तालुक्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना बसला आहे. तरीही या इसमावर वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.
आपल्याला या योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळावी म्हणून वारंवार हेलपाटे मारून तालुक्यातील हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र या पिडीत शेतकऱ्यांची गार्हाणे ऐकण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी किंवा विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्यांकडे वेळ नाही.
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हि कल्याणकारी योजना सुरू केली आहे.मात्र या कल्याणकारी योजनेचा शेतकऱ्यांना योग्य प्रकारे लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी असंतोष निर्माण होत आहे.
तरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांचा कैवार घेवुन PM kisan योजनेचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून
देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी वर्ग आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
0 Comments