google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरसह अन्य मनपाच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच

Breaking News

सोलापूरसह अन्य मनपाच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच

सोलापूरसह अन्य मनपाच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह? सर्वोच्च न्यायलयात सुनावणी थेट मार्चमध्ये

मुंबई, सोलापूर ,पुण्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे.

 याच संदर्भात आता मोठी अपडेट आता समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका संदर्भातील याचिकेवर सुनावणी आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार का, याबाबत अजूनही साशंकता आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील प्रकरणांवरील याचिका लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी सर्वच पक्षांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायालयात या निवडणुकांसदर्भात सुनावणी पार पडली. 

यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी 21 मार्च ऐवजी आता 14 मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. आता याबाबत न्यायालयाने फक्त एक आठवडा आधीची तारीख दिली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात 14 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच निवडणूका होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्यातील 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषद आणि 207 नगरपरिषद निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र या प्रकरणावर न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची आणि सदस्यांची संख्या वाढवण्याचा मविआ सरकारचा निर्णय,

 प्रभाग व सदस्यसंख्या पूर्ववत करण्याचा शिंदे सरकारचा निर्णय आणि उर्वरित 96 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करायचे की नाही, अशा विविध मुद्द्यावर याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत.

Post a Comment

0 Comments